Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जयनगर विद्युत उपकेंद्रावर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे शेतीला विजेचा अपुरा पुरवठा, नवीन विद्युत उपकेंद्राची मागणी

Mahesh Patil by Mahesh Patil
February 20, 2022
in सामाजिक
0
जयनगर विद्युत उपकेंद्रावर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे शेतीला विजेचा अपुरा पुरवठा, नवीन विद्युत उपकेंद्राची मागणी

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील जयनगर येथील 33/11 केव्ही विद्युत उपकेंद्र असून याच्यावर शेतीसाठीचा विजेचा अतिरिक्त भार पडत असल्यामुळे वेळोवेळी वीज खंडित होत असून शेतकऱ्यांना शेतीसाठी पूर्ण आठ तास वीज मिळत नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून अतिरिक्त भार कमी करण्यासाठी येथील विद्युत उपकेंद्राची पावर ट्रांसफार्मरची क्षमता वाढविण्याची किंवा अजून एक नवीन विद्युत उपकेंद्र उभारण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
जयनगर येथे असलेल्या विद्युत उपकेंद्रातून शेतीसाठी जयनगर, कोंढावळ खापरखेडा, उभादगड, निंभोरे, धांद्रे बुद्रुक, धांद्रे खुर्द, कहाटूळ, लोंढरे या गावांच्या शेतशिवारात वीज पुरविली जाते. विद्युत उपकेंद्राला जोडलेली गावे जास्त असल्यामुळे या गावांमधील शेतातील डीपींची संख्या लक्षात घेता उपकेंद्रात ऊपलब्ध असलेल्या ट्रांसफार्मरची क्षमता कमी पडत आहे. त्यामुळे दिवसा व रात्री शेतीसाठी वीज पुरवठा होत असताना विद्युत उपकेंद्राला अतिरिक्त विजेच्या भारमुळे बाकी डीप्यांचे कनेक्शन तोडावे लागत आहे. शिवाय पूर्वी आठ दिवस दिवसा व आठ दिवस रात्रपाळी अशी शेतकऱ्यांना वीज दिली जायची. मात्र आता उपकेंद्रावर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे पंधरा दिवसांपर्यंत रात्रपाळी व पंधरा दिवसांपर्यंत दिवस पाळी असे नियोजन करून शेतकऱ्यांना वीज दिली जात आहे. मात्र अतिरिक्त भारमुळे वेळोवेळी होत असलेल्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतीला पूर्णपणे आठ तास वीज मिळत नाहीये.
जयनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस, पपई, केळी, मिरची पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. यांना सलग पाणी भरणे खंडित वीज पुरवठ्यामुळे शक्य होत नाहीये. तसेच रब्बी पिकांनाही खंडित वीज पुरवठ्यामुळे पाणी भरता येत नसल्यामुळे पिकांवर ताण पडत आहे. येथील उपकेंद्रात असलेला ट्रांसफार्मरवर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे उपकेंद्राला वेळोवेळी वीज खंडित करावी लागत असल्याने शेतीसाठी पूर्ण आठ तास शेतकऱ्यांना वीज भेटत नसल्यामुळे शेतकरी वर्ग संतप्त झाला आहे.

नवीन विद्युत उपकेंद्राची मागणी
जयनगर येथे असलेल्या 33/11 उपकेंद्रात शेतीसाठी वीज पुरवठा करणाऱ्या गावांची संख्या जास्त असल्यामुळे अतिरिक्त विजेचा भार या उपकेंद्रावर पडत आहे. त्यामुळे येथील उपकेंद्राचा अतिरिक्त विजेचा भार कमी करण्यासाठी विद्युत उपकेंद्रात असलेल्या पावर ट्रांसफार्मरची क्षमता वाढवून द्यायला हवी किंवा कोंढावळ व खापरखेडा पैकी एका ठिकाणी स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारायला हवे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आई वडिलांचा छळ करणाऱ्या मुलांविरूद्ध कायदेशिर कार्यवाही व्हावी या मागणीसाठी पिडीत ज्येष्ठ नागरिक संघातर्फे प्राणांतिक उपोषण

Next Post

एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजी प्रायव्हेट लिमीटेड येथे शिवजयंती साजरी

Next Post
एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजी प्रायव्हेट लिमीटेड येथे शिवजयंती साजरी

एक्सलंसिया डिजीटल टेक्नॅालॅाजी प्रायव्हेट लिमीटेड येथे शिवजयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

October 21, 2025
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

October 21, 2025
चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

October 20, 2025
आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी पाठपुरावा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार सुमारे 54 लाख रुपयांचा निधी

October 20, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group