म्हसावद l प्रतिनिधी-
राज्यातील सर्व शाळा कोरोनाचे नियम पाळून सुरू करण्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री,आदिवासी विकास मंत्री,आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक,प्रकल्प अधिकारी तळोदा,जिल्हाधिकारी नंदुरबार यांना बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष गणेश खर्डे यांनी ऑनलाईनने निवेदनाव्दारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव होताच राज्यातील शाळा १० जानेवारीपासून इ.१० वी,१२ वीचे वर्ग वगळता इतर सर्व वर्ग बंद करण्यात आले.मात्र,५० टक्क्यांनी शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरंट,उपहारगृहे,
सिनेमा,थिएटर्स,बार,यात्रा,इतर सुरू आहेत.शाळाही दिवसाला ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवणे आवश्यक होते. कारण,कोरोनामुळे गेल्या दीड-दोन वर्षे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.विद्यार्थ्यांचे न भरून निघणारे शैक्षणिक नुकसान झाले आहे.ग्रामीण भागात अत्यंत वाईट परिस्थिती झाली आहे.ग्रामीण भागात अगोदरही शाळा बंद असतांना आर्थिक परिस्थितीमुळे हॅन्डराईड मोबाईल नव्हते.मोबाईल आहे तर नेटवर्क नाही.अशा परिस्थितीत ऑनलाईन शिक्षणही झाले नाही.तज्ञांचे मते,सतत मोबाईल वापरामुळे मुलांना डोळ्यांचे आजार,डोके दुखणे,मानसिक दोष निर्माण झाले आहे.अभ्यासाची सवय मोडली आहे.तरी,विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोरोनासंबंधीचे सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी चे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,आदिवासी विकास मंत्री,आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक,प्रकल्प अधिकारी तळोदा,जिल्हाधिकारी नंदुरबार यांना ऑनलाईनने बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पत्रकार संघाचे गणेश खर्डे मलगाव यांनी केली आहे.