Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राजस्थान येथे होणाऱ्या आदिवासी महासंमेलनात पारंपरिक पेहराव बंधनकारक, राज्यस्तरीय सभेत आदिवासी एकता परिषदेचा निर्णय

team by team
December 24, 2021
in राज्य
0
राजस्थान येथे होणाऱ्या आदिवासी महासंमेलनात पारंपरिक पेहराव बंधनकारक, राज्यस्तरीय सभेत आदिवासी एकता परिषदेचा निर्णय

नंदुरबार l प्रतिनिधी
अवघ्या देशातील आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करणे, जीवनमूल्यांची ओळख करून देणे व खऱ्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी राजस्थान (प्रतापगड) येथे होणाऱ्या एकता परिषदेच्या २९ व्या सांस्कृतिक महासंमेलनात समाजबांधवांनी आदिवासींच्या पारंपरिक पेहराव परिधान करणे बंधनकारक आहे, असा निर्णय नंदुरबार येथे झालेल्या राज्यस्तरीय सभेत घेण्यात आला. महासंमेलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची संयुक्त सभा नंदुरबारात घेण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी रॉबिन नाईक होते, तर ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे, एकता परिषदेचे संस्थापक सदस्य दरबारसिंग पाडवी, राज्य महासचिव डोंगरभाऊ बागुल, जि. प. सदस्य सी. के. पाडवी, सीताराम राऊत, करमसिंग पाडवी, ॲड. अभिजित वसावे, भीमसिंग वळवी, सुनील गायकवाड, प्रेमचंद सोनवणे, ॲड. शितल गायकवाड, ॲड.जयकुमार पवार, ॲड. विजय नाईक, सुभाष नाईक, चंद्रसिंग बर्डे, ॲड.आपसिंग वळवी, जयसिंग वळवी, सरपंच सत्तरसिंग शेमले, सतीलाल शेमले, जमन ठाकरे, दीपक अहिरे, प्रमोद ठाकरे, दीपक ठाकरे, भगवान वाळवी, कृष्णा गावित, जया सोनवणे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
या सभेत महासंमेलनासाठी महाराष्ट्रातुन वक्ते, युवा व महिला सत्राच्या अध्यक्ष पदासाठी नावे घेण्यात आली. रॅली व आर्थिक नियोजन यावर चर्चा करण्यात आली. यासह आदिवासींच्या विविध समस्यांवरही चर्चा करण्यात आली. शिवाय महासंमेलनात प्रत्येक वक्त्यांनी नेमक्या मुद्यावर मत मांडावे, भरकटल्यास मर्यादा आणल्या जातील असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. प्रेमचंद सोनवणे यांनी आदिवासी संस्कृती व जीवन पद्धतीत अवघे विश्व वाचविण्याची ताकद असल्याचे म्हणत हि संस्कृती वाचविण्याचे आवाहन केले. सुनील गायकवाड यांनी प्रस्थापित संस्कृतीचा अवलंब होत असल्याची खंत व्यक्त केली. जया सोनवणे यांनी आदिवासी महिलांच्या समस्या मांडल्या.

विस्थापनाचे कडवट वास्तव:-
रॉबिन नाईक यांनी आदिवासी विस्थापनाचा मुद्दा उपस्थित करीत उकाई धरणामुळे विस्थापित झालेले आदिवासी त्याच धरणामुळे विकास झालेल्या ठिकाणी कमला जात असल्याचे भयावह तथा कडवट वास्तव मांडले. शिवाय विकासासाठी आदिवासी भाग प्रस्थापितांच्या नजरेत असल्याचे म्हणत बांधवांनी दक्ष राहण्याचे आवाहन केले.

आदर्श संहितेला पळवाटा:-
आदिवासींच्या प्रत्येक बाबी मौखिकच राहिल्या, लिखीत बाबींअभावी आदिवासी भागात सर्वाधिक घुसखोरी झाली. याच घुसखोरीमुळे अन्यायी प्रवृत्तीने देखील आपले पाळेमुळे चांगलीच रोवली. परिणामी आदिवासींची आदर्श आचारसंहितेला देखील धोका निर्माण झाल्याचे म्हणत भगवान वळवी यांनी विविध पक्ष व धर्मांमध्ये विभागणाऱ्या समाज बांधवांबाबत खंत व्यक्त केली.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार तहसील कार्यालयातर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन

Next Post

बालिकेच्या विनयभंग प्रकरणी नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Next Post

बालिकेच्या विनयभंग प्रकरणी नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add