Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ.विजयकुमार गावित यांच्या कार्यावर निबंध लेखन करायला सरसावले शेकडो हात

Mahesh Patil by Mahesh Patil
August 13, 2025
in राजकीय
0
डॉ.विजयकुमार गावित यांच्या कार्यावर निबंध लेखन करायला सरसावले शेकडो हात

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार लोकनेते डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विजय गौरव समितीच्या वतीने निबंध लेखन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. विकासाची दिशा ठरवणाऱ्या विचारांना चालना देणारी ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारी ठरली. एकलव्य विद्यालयासह विविध शाळांमधील 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला व डॉ.विजयकुमार गावित यांनी केलेल्या विकास कार्यावर लेखन केले.

एकलव्य विद्यालय, नंदुरबार येथे स्पर्धेचे उद्घाटन पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुहास नटावदकर यांच्या हस्ते झाले. सोबत प्राचार्या सौ. सुहासिनी नटावदकर, समन्वयक सुनील चौधरी, ईश्वर धामणे, बळवंत निकम तसेच मराठी विभागप्रमुख डॉ. गिरीश पवार यांची उपस्थिती कार्यक्रमास अधिक भारदस्त करून गेली.

स्पर्धकांची दमदार उपस्थिती लाभली. एकलव्य विद्यालय, नंदुरबार येथे एकूण ५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत, विचारांची गती आणि सर्जनशीलतेचा आविष्कार घडवला. नववी ते बारावी या गटांसाठी तीन महत्त्वाचे विषय देण्यात आले

1. डॉ. गावित यांच्या नेतृत्वातील जिल्हा विकास,

2. “माझा जिल्हा आणि त्यांचे योगदान”,

3. रस्ते, जल आणि आरोग्य विकास या संदर्भातील कार्य.

या विषयांवर विद्यार्थ्यांनी ठोस आणि विचारपूर्वक मांडणी केली. काही निबंध तर प्रशासकीय अभ्यासकांनाही विचार करायला लावणारे ठरले. याचबरोबर श्रॉफ हायस्कूल, अभिनव विद्यालय, एस ए मिशन हायस्कूल, डी आर हायस्कूल, जिजामाता विद्यालय, राजे शिवाजी विद्यालय येथेही याचप्रमाणे निबंध स्पर्धा पार पडल्या आणि शेकड विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

उद्घाटनपर भाषणात डॉ. सुहास नटावदकर यांनी सर्जनशील लेखनाचे महत्त्व अधोरेखित केले. “जिल्ह्याच्या विकासाची दिशा ही युवकांच्या विचारांतून घडते. ही स्पर्धा म्हणजे भविष्याच्या निर्मितीची पहिली पायरी,” असे ठाम उद्गार त्यांनी काढले. त्यांनी विद्यार्थ्यांना डोळसपणे विचार करीत, वास्तवाशी जुळवून मुद्देसूद मांडणी करण्याचे आवाहन केले.

प्रा. ईश्वर धामणे यांनी डॉ. गावित यांच्या सामाजिक, राजकीय कार्याचा थोडक्यात पण ठसकेबाज परिचय देत स्पर्धेच्या हेतूची स्पष्टता निर्माण केली. प्रा. गिरीश पवार यांच्या संयोजनाखाली संपूर्ण कार्यक्रम अचूकपणे पार पडला. प्रा. चंद्रकांत देसले, किरण देहणकर, श्रावण हुबाळे यांनी नियोजन, पर्यवेक्षण आणि व्यवस्थापन यामध्ये कसोशीने मेहनत घेतली. कार्यक्रमाची सांगता प्रा. योगेश ठाकरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

 

ही निबंध स्पर्धा केवळ लेखनापुरती मर्यादित नव्हती, तर विद्यार्थ्यांच्या मनात विकासाची बीजे रोवणारी होती. लोकनेते विजयकुमार गावित यांच्या कार्याविषयी मंथन घडवणारी होती.

बातमी शेअर करा
Previous Post

दहिंदुले येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

Next Post

डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत भालेर गावात भव्य तिरंगा रॅली

Next Post
डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत भालेर गावात भव्य तिरंगा रॅली

डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत भालेर गावात भव्य तिरंगा रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

October 17, 2025
पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

October 17, 2025
भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

October 17, 2025
वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

October 17, 2025
गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

October 17, 2025
एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

October 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group