नंदुरबार l प्रतिनिधी-
सरकारी काम सहा महिने थांब अशी म्हण प्रचलित आहे.मात्र विरुद्ध घटना नंदुरबार तालुक्यातील भालेर येथे घडल्याने शेतकऱ्यांनी मंडळ अधिकारी व तलाठीचा जाहीर सत्कार करण्यात आला.
शासकीय अधिक कर्मचारी प्रती सर्व सामान्य नागरिकाचा कायमस्वरूपी दुराग्रह बांधला गेला आहे. ते म्हणजे वेळेवर काम होत नाही ,कधीही पूर्ण न्याय मिळत नाही, प्रत्येक कामासाठी हेलपाटे मारून ही कामे पूर्ण होत नाही अशी भावना रुजली आहे.
मात्र काही शासकीय अधिकारी कर्मचारी याला अपवाद आहेत. आपल्या कामाचा ठसा उमटवत सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी अहोरात्र काम करून न्याय देण्यासाठी प्रयत्न करतात, सर्वसामान्यांना आपलेसे वाटतात त्यामुळे कृतज्ञता म्हणून त्यांचा सत्कार ही सामान्य कडून मोठ्या उत्साहाने सार्वजनिक सत्कार केला जातो.
अशीच घटना नंदुरबार तालुक्यातील भालेर येथे घडली मागील वर्षी खोंडामळी मंडळातील 65 टक्के शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. त्या सर्वांना हेक्टरी 28 हजार पाचशे प्रमाणे भरपाई मिळाली. मागच्या वर्षी भयंकर दुष्काळ होता त्या कारणाने खोंडामळी मंडळाचे मंडळ अधिकारी अनिल पानपाटील यांनी व भालेर सजेचे तलाठी नरेंद्र महाले यांनी खोंडामळी सजा परिसरातील गावातील प्रत्यक्ष पाहणी करून अत्यल्प आणेवारी जाहीर करून पीक विमा योजनेचा शेतकरी बांधवांना भरघोस लाभ मिळवून दिला. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हार्दिक हातभार लागला.त्या बद्दल भालेर परिसरातील शेतकरी बांधवांनी व ज्येष्ठ नागरिकांनी तसेच सरपंच व उपसरपंच, सदस्य ग्राम पंचायत भालेर यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.