नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची नाशिक येथे बदली झाल्याने त्यांना निरोप आणि सत्कार करण्यात येणार आहे. 27 ऑगस्टला सकाळी साडेदहाला कन्यादान मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होईल अशी माहिती नागरी सेवा समितीतर्फे विजय चौधरी यांनी दिली.
श्रीमती खत्री यांची नंदुरबार जिल्हाधिकारी पदावरून नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये नंदुरबार जिल्ह्यात विकासात्मक दृष्ट्या प्रशासकीय कामकाज झाले. त्यांच्या बदली निमित्त त्यांचा निरोप आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी विविध संस्था संघटनांनी निरोप सत्कारासाठी उपस्थित राहावे असे आवाहन श्री. चौधरी यांनी केले आहे.