नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन,महसूल व वनविभाग यांच्यामार्फत दाट वस्तीच्या ठिकाणी अथवा छोट्या स्वरूपातील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फायर बाईकची निर्मिती करण्यात आली असून, नंदुरबार नगरपरिषदेला ५ गाड्या देण्यात आल्या आहेत. बाईक स्वरूपात अग्निशमन गाड्या मिळाल्याने लवकर मदत मिळणार असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी केले.
गाड्या मिळाल्यानंतर शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी चालकांकडून फायर बाइकची माहिती जाणून घेतली. त्यानंतर माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी वाहनांचे पूजन केले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,विनोद तांबोळी,वाल्मीक मिस्तरी, पालिकेचे अग्निशमन विभागातील कार्यालयीन लिपिक जयराज साबळे उपस्थित होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी म्हणाल्या,शहरात अनेक वस्त्या ह्या दाटीवाटीच्या असल्याने आपत्तीच्या प्रसंगी घटनास्थळी पालिकेकडील मोठ्या गाड्या जाऊ शकत नाही. आता बाईक स्वरूपात अग्निशमन गाड्या मिळाल्याने लवकर मदत मिळणार आहे.