नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी सोळा दिवसापासून आंदोलन सुरू आहे मात्र शासनाने याकडे लक्ष दिले नाही म्हणून शासनाला जागी करण्यासाठी शासनाचे निषेधार्थ आंदोलकांनी घंटांना आंदोलन केले.
महाराष्ट्राच्या पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आजतागायत सुटलेले नसल्यामुळे आदिवासींसाठी मिनी मंत्रालय असलेले ट्रायबल एडव्हायझरी कौन्सिलची बैठक तात्काळ घेणेत, आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट कायदा पारित करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी नंदुरबार येथे गेल्या 16 दिवसापासून आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्या साठी आंदोलन करीत आहे.आंदोलनाला अनेक आदिवासी सामाजिक संघटनांनी व राजकीय पक्षांनी बिनशर्त पाठींबा दिलेला आहे.
धरणे आंदोलनाला 16 दिवस झाले असतांना देखील शासन स्तरावर आंदोलनाची गंभीर दखल घेतली गेली नाही. म्हणून कुंभकरणाच्या झोपेत असलेल्या शासनाला जागे करण्यासाठी व न्याय हक्कासाठी आज आंदोलकां तर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले.
हे घंटानाद आंदोलन जी.प.सदस्य भरत गावित यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी के टी गावित, हिरामण पाडवी,वैशाली चौधरी,मनोज चौधरी, राणी गावित,यशवंत गावित,डॉ. सुनिल गावित, बकाराम गावित,अजय गावित,राजेंद्र पवार ,दिलीप गावित,व आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.