Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बंद आंदोलन म्हणजे आघाडीची नौटंकीच, आर्थिक संकटात लोटणाऱ्या आंदोलनात लोकांनी सहभागी होऊ नये : विजय चौधरी

Mahesh Patil by Mahesh Patil
October 10, 2021
in राजकीय
0
बंद आंदोलन म्हणजे आघाडीची नौटंकीच, आर्थिक संकटात लोटणाऱ्या आंदोलनात लोकांनी सहभागी होऊ नये : विजय चौधरी

नंदुरबार l प्रतिनिधी-

सातत्याने दीड वर्षापासून कोरोना काळामुळे नंदुरबार जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या व्यवसायांवर संकटे येत आहे व सर्व छोटे मोठे व्यवसाय मोडकळीस आले आहेत जेमतेम आता कुठे सुरुवात होत असतानाच बंद पुकारणे कितपत योग्य आहे ? आर्थिक संकटात आलेल्या सामान्य लोकांना पुन्हा आर्थिक आघात करण्यासारखे आहे म्हणून आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो कि अशा जनता द्रोही आंदोलनात कोणीही सहभागी होऊ नये.असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे  की, एका राज्यातले शेतकरी आत्महत्या करीत आहेत, वीज आणि बँकांच्या वसुलीने त्रासलेला आहे असे असतांना राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकर्‍यांना आधार वाटेलसे काहीही करू शकलेली नाही आणि कल्याणकारी योजनाही देऊ शकलेले नाही. ते पाप झाकण्याासाठीच महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि त्यांचे समर्थन करणार्‍या संघटना योगी सरकारला विरोध दर्शवत बंद आंदोलन पुकारण्याची नौटंकी करीत आहे.
वास्तविक भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारने सातत्याने शेतकरी हिताच्या योजना राबवणे सुरु ठेवले आहे. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून माननीय मोदीजींनी शेतकर्‍यांच्या हाती पैसा दिला. जेव्हा उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा ते एकदा थेट शेतकर्‍यांच्या बांधांवर जाऊन आंदोलन करून आले होते व दरहेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी मांडली होती. मग आज ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शेतकर्‍यांना आतापर्यंत कोणताही शब्द पाळून मदत दिलेली नाही. आम्ही त्यांना जाब विचारतो की, अतिवृष्टीमुळे अनेकांचे पीक जमीन वाहून गेल्याने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना दरहेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करणार आहात का? दिलेले वचन पाळणार आहात का? हे आधी जाहीर करावे. जाणता राजा म्हणवणारे शरदराव पवार देखील अनेक वर्षे केंद्रीय कृषी मंत्री होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात शेतकर्‍यांचे कोणते भले झाले? याचा जाहीर जबाब द्यावा. असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी शासनाला जाब विचारला आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

‘ प्रेमधर्माची ‘ जागा ‘ द्वेषधर्म ‘ घेत आहे; ज्येष्ठ साहित्यिक पीतांबर सरोदे यांचे प्रतिपादन

Next Post

नंदनगरीत फेब्रुवारीत अभाविपचे प्रदेश आधिवेशन ठरणार ऐतिहासिक

Next Post

नंदनगरीत फेब्रुवारीत अभाविपचे प्रदेश आधिवेशन ठरणार ऐतिहासिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत रक्तदान शिबिर

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत रक्तदान शिबिर

November 17, 2025
हरणखुरी गावाचे आरोग्यदूत पाऊल : पात्र लाभार्थ्यांची १०० टक्के आयुष्मान कार्ड नोंदणीची ऐतिहासिक कामगिरी

हरणखुरी गावाचे आरोग्यदूत पाऊल : पात्र लाभार्थ्यांची १०० टक्के आयुष्मान कार्ड नोंदणीची ऐतिहासिक कामगिरी

November 17, 2025
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत बोकळझर, कळंबू ग्रामपंचायतींची तपासणी

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत बोकळझर, कळंबू ग्रामपंचायतींची तपासणी

November 17, 2025
जिल्हा युवा साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन, ग्रंथदिंडी, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, कवी संमेलनाने रसिक मंत्रमुग्ध

जिल्हा युवा साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन, ग्रंथदिंडी, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, कवी संमेलनाने रसिक मंत्रमुग्ध

November 17, 2025
जिल्ह्यांत १९ लाख ५५ हजार नागरिकांची तपासणी होणार,आजपासून कुष्ठरोग शोध अभियान

जिल्ह्यांत १९ लाख ५५ हजार नागरिकांची तपासणी होणार,आजपासून कुष्ठरोग शोध अभियान

November 17, 2025
लहान शहादा प्राथमिक आरोग्य केंद्रास राष्ट्रीय सन्मान

लहान शहादा प्राथमिक आरोग्य केंद्रास राष्ट्रीय सन्मान

November 14, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group