Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी हेच देशाचे मुळ मालक : खा.राहुल गांधी

team by team
March 13, 2024
in राजकीय
0
आदिवासी हेच देशाचे मुळ मालक : खा.राहुल गांधी

नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी हेच जल, जंगल आणि जमीन व देशाचे मुळ मालक आहे. मोदी सरकारने मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले आहे. यात आदिवासी, शेतकरी, शेतमजूरांचे किती कर्ज माफ झाले? असा सवाल उपस्थित करत कॉँग्रेस नेते राहूल गांधी यांनी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला आहे.

 

 

 


कॉँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रेची नंदुरबारातून सुरुवात करण्यात आली आहे. यानिमित्त आयोजित सभेप्रसंगी राहूल गांधी यांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला.
कॉँग्रेसचे नेते राहूल गांधी भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त नंदुरबारात येणार असल्याने यानिमित्त गेल्या आठवडाभरापासून कॉँग्रेसची तयारी सुरु होती.दरम्यान, काल सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी यासाठी पोलिस प्रशासनाच्यावतीने खबरदारी घेण्यात आली होती. दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास नंदुरबार येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावरील हेलिपॅडवर राहूल गांधींचे हेलिकॉप्टरने आगमन झाले. यानंतर उशिर झाला असल्याने रोड शो रद्द करत ते थेट कारने सी.बी.मैदानावरील सभास्थळी दाखल झाले. या दरम्यान, ठिकठिकाणी राहुल गांधींना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. राहुल गांधी सभास्थळी दाखल झाल्यानंतर कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह संचारला होता.

 

देशात शांतता, समृद्धी नांदावी यासाठी नवस मानलेली आदिवासी न्याय होळी कॉँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. याप्रसंगी असली, पाडामुंड, अस्तंभा येथील सुमारे ४० ते ५० युवतींच्या एका पथकाने आदिवासी होळी नृत्य सादर केले.

 

 

 

 

यावेळी राहूल गांधी यांनी देखील देवमोगरा माता की जय म्हणत होळीभोवती प्रदक्षिणा घेतली व होळीचा प्रसादाचा दांडा पहिल्याच प्रयत्नात तोडल्याने उपस्थितांनी कौतूक देखील केले. सभेला सुरुवात झाल्यानंतर सभेदरम्यान राहूल गांधी म्हणाले की, भाजपा सरकारचा आदिवासींच्या जमीनीवर डोळा आहे. यामुळे भाजपा आदिवासींना वनवासी संबोधते. बड्या उद्योगपतींना जमीनी देऊन आदिवासींना भूमीहीन करण्याचे षडयंत्र भाजपाचे आहे. मात्र आदिवासी हेच जल, जंगल आणि जमीन व देशाचे मुळ मालक आहे. हेच सिद्ध करण्यासाठी सन २०१० मदद्ये कॉँग्रेसचे सरकार असतांना आधार कार्ड योजनेचा शुभारंभ नंदुरबार येथून केल्याचे गांधी यांनी सांगितले. २४ वर्षांचा मनरेगाचा पैसा इतकी रक्कम असलेले कर्ज मोदी सरकारने धनदांडग्यांचे माफ केले आहे. देशात ८ टक्के आदिवासी असतांना त्यांना भागिदारी किती? हा चिंतनाचा विषय असल्याचे राहूल गांधी म्हणाले. भारत सरकार १०० रुपये खर्च करत असेल तर त्यात आदिवासींना मिळणारा लाभ अवघा १० पैसे इतका आहे. भारतात चोहीकडे अन्याय आणि अत्याचार होत आहे. आदिवासी, दलितांच्या जमीनी संपादीत केल्या जात असून जल, जंगल, जमिनीपासून आदिवासींना वंचित ठेवले जात आहे. मोठ्या शाळा, महाविद्यालय, रुग्णालये यामध्ये कोठेही आदिवासींना थारा नसल्याचे देखील राहूल गांधी यांनी सांगितले. भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, आर्थिक सर्वे करण्यात यावा, आदिवासींना ८ टक्के भागिदारी देण्यात यावी, शेतकऱ्यांसाठी एमएसपी कायदा करण्यात यावा, आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीनी देण्यात याव्या यासारख्या विविध मागण्यांसाठी लढा सुरु असल्याचे राहूल गांधी यांनी सांगितले. दरम्यान, कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाच्या अत्याचारी व्यवस्थेचे उत्तर देण्यासाठी कॉँग्रेसची लढाई सुरु आहे. महिला अत्याचाराची घटनांमध्ये वाढ झालेली असतांना न्याय मिळत नाही. शोषित, पिडीत समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कॉँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरु असल्याचे सांगितले.

 

 

 

सुत्रसंचालन विष्णू जोंधळे तर आभार जिल्हा कॉँग्रेस कमिटी अध्यक्ष आ.शिरीष नाईक यांनी मानले. दरम्यान, कायदा आणि सुवस्थेच्या दृष्टीने पोलिस अधिक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलिस अधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलिस निरीक्षक राहूल पवार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३०० पोलिस कर्मचाऱ्यांसह एसआरपीएफचे प्लाटून असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बातमी शेअर करा
Previous Post

काँग्रेसचे माजी पालकमंत्री ॲड. पद्माकर वळवी भाजपा प्रवेश निश्चित

Next Post

शिवसेना नेते,माजी आ. चंद्रकांत रघुवंशींच्या प्रयत्नांचे फलित मुस्लिम कब्रस्तान रस्त्यासाठी निधी मंजूर; रस्त्याचे भूमिपूजन

Next Post
शिवसेना नेते,माजी आ. चंद्रकांत रघुवंशींच्या प्रयत्नांचे फलित मुस्लिम कब्रस्तान रस्त्यासाठी निधी मंजूर; रस्त्याचे भूमिपूजन

शिवसेना नेते,माजी आ. चंद्रकांत रघुवंशींच्या प्रयत्नांचे फलित मुस्लिम कब्रस्तान रस्त्यासाठी निधी मंजूर; रस्त्याचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add