Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

येत्या पंधरा दिवसात तापी-बुराई योजनेला आवश्यक मान्यता प्राप्त होणार : डॉ.विजयकुमार गावित

team by team
November 23, 2023
in राजकीय
0
येत्या पंधरा दिवसात तापी-बुराई योजनेला आवश्यक मान्यता प्राप्त होणार : डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता तातडीच्या उपाय योजना करणे चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून तापी – बुराई योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करणे चालू असून त्याला यश आले आहे. त्या कामाला आवश्यक असलेली शासकीय मान्यता येत्या पंधरा दिवसात प्राप्त होईल; अशी माहिती आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली.

 

 

यावर्षी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले. नंदुरबार तालुक्यात देखील सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला. नदी नाल्यांना पूर न आल्यामुळे धरणांमध्ये पुरेसा जलसाठा झालेला नाही तसेच तलाव आणि बंधारे यातही पाणी साठलेले नाही. परिणामी अद्याप हिवाळा चालू असतानाच येत्या उन्हाळ्यात अनेक गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागेल असे दिसत आहे. नंदुरबार तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे दिसत आहेत. त्या सर्व पार्श्वभूमीवर प्रलंबित तापी-बुराई योजना तातडीने पूर्णत्वास येणे आवश्यक बनले आहे.

 

 

या संदर्भाने माहिती देताना आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की, येत्या उन्हाळ्यात अनेक गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागेल असे दिसत आहे. नंदुरबार तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे दिसत आहेत. ते सर्व लक्षात घेऊन राज्य सरकारकडे मी सातत्याने पाठपुरावा चालवला असून तातडीच्या काही उपाय योजना केल्या जाव्या असे सुचविले आहे.

 

 

दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यावर चर्चा केली होती. प्रलंबित तापी बुराई योजनेचा उर्वरित टप्पा पूर्ण केला जावा, अशी आग्रहाची मागणीही मांडली होती. त्याला आता यश मिळाले असून येत्या पंधरा दिवसात तापी बुराई योजनेला आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय मान्यता प्राप्त होतील आणि पुढील चार महिन्यात तापी बुराई योजनेचे काम पूर्णत्वास येऊन पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

संविधान दिवसानिमित्त शहाद्यात दि.26 रोजी संविधान रॅलीसह प्रबोधनात्मक जनजागृती कार्यक्रम

Next Post

लोकसभा निवडणुकीत राज्यातील 45 पैकी 45 जागांवर महायुती विजयी होणार : चंद्रशेखर बावनकुळे

Next Post
लोकसभा निवडणुकीत राज्यातील 45 पैकी 45 जागांवर महायुती विजयी होणार : चंद्रशेखर बावनकुळे

लोकसभा निवडणुकीत राज्यातील 45 पैकी 45 जागांवर महायुती विजयी होणार : चंद्रशेखर बावनकुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add