नंदूरबार l प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबारतर्फे पळाशी येथील स्व.राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर बाजार समितीचे परवानाधारक खरीदार यांच्या मार्फत कापूस खरेदीचा शुभारंभ मा.आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
कापूस केंद्रावर 16 वाहनांमधून जवळपास 200 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून 6 हजार 700 पासून 7 हजार 290 प्रतिक्विंटल या प्रमाणे कापसाला दर देण्यात आला आहे.
शुभारंभ प्रसंगी बाजार समितीचे सभापती विक्रमसिंग वळवी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील, बाजार समितीचे उपसभापती शरद पाटील, संचालक किशोर पाटील,नवीन बिर्ला,मधुकर पाटील, संजय पाटील, लकडू चौरे, गोपीचंद पवार कापूस खरेदीदार अशोक चौधरी, प्रकाश अग्रवाल, गिरीश अग्रवाल, कृष्ण,अग्रवाल,गोविंद अग्रवाल भारतीय कपास निगमचे ग्रेडर जयदीपसिंह ठाकूर,बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर, कर्मचारी संजय वाणी व काळुसिंग वळवी तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते. सर्व शेतमाल विक्रेते व शेतकरी बांधवांनी आपला कापूस स्वच्छ व कोरडा करून विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले.