Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुष्काळ परिस्थितीमुळे सैताने येथील शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले

team by team
September 30, 2023
in क्राईम
0
दुष्काळ परिस्थितीमुळे सैताने येथील शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले

नंदूरबार l प्रतिनिधी

सैताणे ( ता. नंदुरबार) येथील शेतकरी सुदाम गोपीचंद सोनवणे (वय ४९) यांनी कर्जबाजारी झाल्याने आपल्या शेतात २९ सप्टेंबर ला दुपारी तिनला शेतात गळफास घेऊन कायमची जीवनयात्रा संपवली. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.

 

 

सैताणे या गावाला दरवर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. यामुळे शनिमांडळ येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून व इतर घेतलेले कर्ज दिवसेंदिवस वाढत असल्याने आलेल्या नैराश्यातून नंदुरबार तालुक्यातील सैताणे येथे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याने आपल्या शेतात २९ सप्टेंबर दुपारी तीन च्या सुमारास शेतात गळफास घेऊन कायमची जीवनयात्रा संपवली.

 

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील सैताणे येथील सुदाम गोपीचंद सोनवणे (वय ४९) यांच्या परिवारात दोन मुले व दोन सुना व पत्नी, दोन भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. त्यांची बलवंड शिवारातील सुमारे आठ एकर शेती असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. यावर्षी शेतीच्या भांडवल साठी घेतलेले पीक कर्ज ,रात्रंदिवस शेतात मेहनत करत होते. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या तीन ते चार वर्षापासून सतत असणारा दुष्काळ व यामुळे शेतात केलेला खर्चही निघेनास झाला. शिवाय सैताणे येथील अमरावती नदीला सुद्धा ह्या वर्षी एकदा सुद्धा पाणी आले नाही.दिवसेंदिवस कुटूंबाचा गाडा चालविणे कठीण होत होते.

 

 

 

दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत असल्याने व शेतातून उत्पन्न मिळत नसल्याने सुदाम सोनवणे यांना नैराश्य आल्याने त्यांनी २९ सप्टेंबर ला शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या परिवाराला शासन किती मदत करेल,अशी मदत न करता त्यांच्या कुटुंबाने तापी बुराई हा प्रकल्प लवकरात लवकर होऊन निदान दुसऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मयत शेतकरी तापी बुराई उपसा जलसीचन योजने लवकरात लवकर व्हावी यासाठी रनाळे येथे रास्ता रोको साठी सुध्दा हजर होते. एकूणच नंदुरबार तालुक्यातील अश्या बऱ्याच शेतकरी आत्महत्या या पूर्व पट्यात च का असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना तापी बुराई योजनेला गती देऊन शेतकरी माय बाप चा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा असा संतप्त शेतकरी कडून प्रश्न निर्माण होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सेलंबा येथे तणावपूर्ण शांतता,दोन समुदायात दगडफेक

Next Post

सेवा पंधरवाडा निमित्त आज भाजपातर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिर

Next Post
सेवा पंधरवाडा निमित्त आज भाजपातर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिर

सेवा पंधरवाडा निमित्त आज भाजपातर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add