नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील रनाळे येथे बसगाड्यांना थांबा देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी व पालकांनी सोमवारी रास्ता रोको केला होता. याप्रकरणी २० जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.नंदुरबार ते – दोंडाईचा दरम्यान असलेल्या बसगाड्या रनाळे बसस्थानकात थांबत नसल्याच्या कारणातून विद्यार्थी व पालकांनी सोमवारी सकाळी रास्ता रोको केला होता. यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी सर्व गाड्यांना थांबा देण्याची मागणी करत बसगाड्या थांबवून ठेवल्या होत्या. यातून वाहतूक कोंडी होऊन जमावबंदी आदेशांचे उल्लंघन झाले होते. यावेळी जमावातील काहींनी एसटीचे चालक आणि वाहकांसोबत हुज्जत घालून दमदाटी केली होती. यातून सोमवारी धावणाऱ्या रात्री उशिरा नंदुरबार आगारातून आला आहे.
याप्रकरणी आगार व्यवस्थापक संदीप कृष्णा निकम यांनी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जितेंद्र दिवाकार ओगले (३५), हेमंत नागरे (३८), गोकूळ लक्ष्मण नागरे (४२), पिण्या रमेश तांबोळी (२५), मयूर राजू पेटकर (२४), सनी सोनार (२१), गौरव चौधरी (३२) यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात तपास पोलिस उपनिरीक्षक प्रतीक भिंगारदे करीत आहेत