नंदुरबार l प्रतिनिधी
येथील प्रवासी व नागरिकांतर्फे राज्यातील श्री क्षेत्र असलेल्या विठ्ठल मंदिरात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे त्या अनुषंगाने रेल्वे सुरू करण्याच्या मागणी संदर्भात खा डॉ हिना गावित यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
नंदुरबार येथे खा डॉ हिना गावित यांना श्रीक्षेत्र पंढरपूर येथे रेल्वे सुरू करण्याच्या संदर्भात निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे .या निवेदनात म्हटले आहे की, आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यात्रा भरत असते त्यासोबत वर्षभर भाविक तसेच या शहर व जिल्ह्यातील नागरिक हे पंढरपूर व सोलापूर येथे कामानिमित्त किंवा नोकरीनिमित्त, नातेवाईकांकडे ये जा सुरू असते त्यासाठी त्यांना एसटी बस किंवा अन्य खाजगी वाहनांच्या आधार घ्यावा लागतो यासाठी आम्हाला अडचणी येत असतात.
सदर रेल्वे सेवा ही अहमदाबाद किंवा सुरत येथून नंदुरबार मार्गे जळगाव मनमाड कोपरगाव नगर दौंड कुठे वाडी मार्गे पंढरपूर रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी सदर मागणी ही अनेक वर्षांपासूनची आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास मतदारसंघातील नागरिक आपले ऋणी राहतील त्यामुळे आपल्या माध्यमातून केंद्रीय स्तरावरून सदर रेल्वे सेवेसाठी आपण पाठपुरावा करून सुरू करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर अर्जुन हटकर, संतोष पाटील, महादेव भंडगर, नायणेश्वर भंडगरअनिल भूसनर, गोपाल डायगडे भूषण सोपनर, किशोर भोसले, सुरेंद्र हटकर, युवराज भंडगर संजय मराठे, गजानन हटकर अरुण चौधरी, दत्तू सूळ पुंडलिक मोरे, बाळू जाधव रविंद्र काशीद, रविंद्र हटकर, हिरामण पाटील,भावेश हटकर, रघनाथ भडगर, मलाआप्पा हटकर, नंदू पाटील, अजय सोपनार, कैलास पाटील यांच्या सह्या आहेत.