नंदूरबार l प्रतिनिधी

योजक संस्था, नंदुरबार डिस्ट्रिक डेव्हलपमेंट कौन्सिल व वात्सल्य समिती नंदुरबार,यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक गाव व पाड्यावर एकूण 25 हजार वृक्ष लागवडीचे नियोजन पूर्ण झाले आहे.या साठी सुहाना मसाला यांचे विशेष सहकार्य लाभले व सर्व वृक्ष नंदुरबार येथे दाखल झालेत. या सर्व वृक्षांच्या वृक्ष पुजनाचा कार्यक्रम पातोंडा येथील सरदार पटेल शैक्षणिक संकुल येथे आयोजीत केला होता.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून या संस्थेचे चेयेरमन ॲड. प्रभाकर पटेल,प पू संत तारादासजी बापू,भागवत कथाकार अविनाश महाराज,आप की जय संप्रदाय प्रमुख जितू पाडवी,स्वाध्याय परिवाराचे संतोष जाधव,वारकरी संप्रदाय प्रमुख ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा संघ चालक गुलाबसिंग वसावे, योजकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.गजानन डांगे,वात्सल्य सेवा समिती अध्यक्ष पंकज पाठक आदी उपस्थित होते.
कार्यक्रम प्रास्ताविकात डॉ.गजानन डांगे यांनी भूमी सुपोषण, पर्यावरण क्षेत्रात जिल्ह्याची सद्य स्थिती यावर प्रकाश टाकत C-20अंतर्गत या विषयी जागतिक पातळीवरील कार्य व भारताची भूमिका या बाबत माहिती दिली.दादा शिनगर यांनी जिल्हाभर झाड वितरणाचे नियोजन, डेपो, वाहतूक व्यवस्था, जिओ टेगिंग ई बाबत सविस्तर माहिती दिली.या नंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्ष पूजन अतुल अग्निहोत्री महाराज यांनी संपन्न केले.
आशिर्वचन “पर मनो गतात” सर्व संत व्यक्तींनी वेद शास्त्र , पुराण,अभंग ई. मध्ये पर्यावरण संवर्धनाचे दाखले देत या उपक्रमाचे कौतुक केले व संपर्कातील भाविकांना या बाबत जागरकता निर्माण करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन पुरुषोत्तम काळे यांनी केले तर आभार पंकज पाठक यांनी मानले.या कार्यक्रमास जिल्हा भरातून या अभियानातील सहभागी व्यक्ती, शहरातील लायन्स, रोटरी, इंजिनियर असोसिएशन ,डॉक्टर असोसिएशन ई संघटनांचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.पाटील, आर्कि.नीरज देशपांडे,आशिष वाणी,ज्ञानेश्वर राजपूत राम दाऊतखाने महेश जोशी,मंगेश उपासनी,प्रशांत पाटील आदींनी परिश्रम घेतले.









