Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रावलापाणी हत्याकांड एक ऐतिहासिक घटनेचे स्मरण : जि. प अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत

Mahesh Patil by Mahesh Patil
March 3, 2023
in राजकीय
0
रावलापाणी हत्याकांड एक ऐतिहासिक घटनेचे स्मरण : जि. प अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत
नंदूरबार l प्रतिनिधी
 २ मार्च आजच्या दिवसाबद्दल समस्त नंदुरबार जिल्ह्यातील तसेच तमाम महाराष्ट्रातील जनतेला माहिती असलेली किंवा बरेच जणांना माहितीच नसलेली घटना म्हणजे महाराष्ट्रात घडलेली जालियनवाला बाग हत्याकांडा सारखे रावलापाणी येथील आदिवासी बांधवांचे हत्याकांड तळोदा तालुक्यात रावलापाणी येथे इंग्रजांनी 2 मार्च 1943 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड याची पुनरावृत्ती केली होती. या घटनेत आपल्या आदिवासी बांधवातील जवळपास पंधरा ते वीस लोक शहीद आणि अनेक गंभीर जखमी झाले होते .
कविवर्य कुसुमाग्रज यांनी त्यांच्या एका कवितेत मराठी वीरांची ऐतिहासिक घटना सांगताना लिहून ठेवले होते की , ‘ दगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा , ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा ” अशीच काहीशी भावना या स्वातंत्र्यवीरांच्या पवित्र स्मारकास भेट देऊन मनात येत होती.
याठिकाणी जिल्हा परिषद नंदुरबार अध्यक्षा डॉ . सुप्रिया विजयकुमार गावित, समाजसेवक डॉ. कांतीलाल टाटिया, आप  जितेंद्र पाडवी महाराज, आप  प्रेम पाडवी महाराज, आप  संजय ठाकरे महाराज, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश वळवी, जिल्हा परिषद सदस्य भरत पवार, रतिलाल पावरा, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, गणेश पाटील, किसन महाराज, नारायण ठाकरे, यशवंत पाडवी, प्रवीण वळवी, रतिलाल ठाकरे तसेच यावेळी महाराष्ट्र , गुजरात,  मध्यप्रदेश येथील असंख्य बंधू – भगिनी यांनी उपस्थिती लावली. सामुदायिक रीतीने स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी 1942 साली महात्मा गांधी आदेशित केलेल्या चलेजाव चळवळीचा काळ या चळवळीत खान्देशातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते.
स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग झालेल्या रावला पाणीच्या स्वातंत्र्यसंग्रामात शहीद झालेले स्वातंत्र्यवीरांची आठवण करून दिली. आप श्री गुलाब महाराजांचे व्यसन मुक्ती व समाज संघटन सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. रावला पाणी संग्रामात शहीद झालेल्या क्रांतिवीरांची आठवण राहावी यासाठी शहीद स्मारक उभारले जाईल असेही सांगितले. समाजसेवक डॉ. कांतीलाल टाटिया यांनी नंदुरबार जिल्ह्यातील देशाचे स्वातंत्र्यासाठी झालेल्या चळवळी आंदोलने सत्याग्रह त्यासाठी भोगलेला कारावास यांचाही संक्षिप्त आढावा, रावलापाणी चा संग्राम तळोदा तालुक्यातील मोरवड येथे आप श्री संत गुलाब महाराज यांनी आदिवासी समाजाचे तात्कालीन परिस्थिती पाहून समाज संघटित करण्याचा प्रयत्न केला. प्रार्थनेच्या माध्यमातून पारतंत्र्याचा काळ असूनही त्या दुर्गम भागात आदिवासी बांधव एकत्र येऊन अहिंसा आणि सदाचाराची शपथ घेत होते.
कोणत्याही प्रस्थापित नेत्याशिवाय सुरू असलेली एकमेव चळवळ, सुसंघटितपणे सुरू असलेली सुधारणावादी चळवळ, सोयीप्रमाणे लाखोंच्या संख्येने आत्मोधार व सामाजिक सुधारणेच्या मांडवाखाली आदिवासींना एकत्र आणून नवक्रांती घडविणारे शिल्पकार गुलाम महाराज ठरले. यानंतर चळवळीची सर्व सूत्र गुलाम महाराजांचे भाऊ  रामदास महाराज यांनी घेतली याविषयी माहिती दिली. उपस्थित सर्व बांधवांची भोजनाची सोय करण्यात आली होती.
बातमी शेअर करा
Previous Post

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला साडेतीन लाखाची लाच घेताना अटक

Next Post

तळोदा बस स्थानकात पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी

Next Post
तळोदा बस स्थानकात पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी

तळोदा बस स्थानकात पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

October 17, 2025
पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

October 17, 2025
भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

October 17, 2025
वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

October 17, 2025
गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

October 17, 2025
एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

October 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group