नंदुरबार l प्रतिनिधी
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील कुंभारखान फाट्याजवळ वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील सिंदुरी येथील वसंत तेजल वसावे, राजेश जेरमा वसावे यांच्यासह अन्य इसम दुचाकीने (क्र.जी.जे.२२ ई ६२१७) अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाने जात होते. यावेळी एका वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात व ाहन चालवून कुंभारखान फाट्याजवळ दुचाकीला समोरुन धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातातवंत वसावे व राजेश वसावे यांचा मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेल्या इसमास दुखापत झाली.
तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत तेजला चांद्या वसावे यांच्या फिर्यादीवरुन वाहन चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक देविदास वडघुले करीत आहेत.








