नंदुरबार l प्रतिनिधी
जलजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी व नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी नियमित उपलब्ध
होण्यासाठी “स्वच्छ जल से सुरक्षा” हे अभियान ग्रामस्तरावर प्रभावीपणे राबवून जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे . तसेच जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी ग्रामस्तरावर अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांनी केले .
जल जीवन सर्वेक्षण२०२३ अंतर्गत “स्वच्छ जल से सुरक्षा “ या अभियानाचा शुभारंभ नंदुरबार जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या . यावेळी उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे महिला व बालकल्याण सभापती संगीताताई गावीत ,शिक्षण सभापती गणेश पराडके , कृषि व पशू संवर्धन सभापती हेमलता शितोळे, समाजकल्याण सभापती शंकर पाडवी , अति. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, प्रकल्प संचालक (DRDA) आर.पी.पाटील,.प्रकल्प संचालक (जल जीवन मिशन)जयवंत उगले,कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु) .संजय बाविस्कर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं), जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा समाज कल्याण अधिकारी,कार्यकारी अभियंता (लघुसिंचन),उपस्थित होते.
जिल्ह्यात दि. १ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वच्छ जल से सुरक्षा हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील सर्व स्त्रोतांचे व नळ पाणी पुरवठा योजनांच्या अस्तित्वातील सर्व स्रोतांचे जिओ टॅगींग,पाणी गुणवत्ता परीक्षण, मान्सून पश्चात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे पाणी गुणवत्ता परीक्षण, ग्रामस्तरावर ग्रामसेवक,आरोग्य सेवक ,जलसुरक्षक,गाव स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या महीलां मार्फत पाणी नमुने गोळा करणे, पाणी नमुन्यांची रासायनिक व जैविक तपासणी करणे व त्याची माहिती संकेतस्थळावर अद्यावत करणे.तसेच एफ टी के किटची उपलब्धता,ग्रामपंचायतनिहाय प्रा.आ.केंद्र स्तरावरिल ,व त्याद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी या सर्व बाबी अभियान स्वरूपात दि.१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे व पाणी पुरवठा योजनांचे Geo Tag सह प्रयोगशाळेत तसेच ग्रामस्तरावर एफ टी के द्वारे विहीत मुदतीत 100 टक्के स्त्रोतांचे रासायनिक व जैविक तपासणी करुन घेण्याचे सर्व संबंधित विभागांना निर्देश दिले.
याप्रसंगी ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक व ग्रामसेवक यांना जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत व सर्व सभापती व मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते रासायनिक व जैविक एफ टी के किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हा पाणी गुणवत्ता तज्ञ नितीन पाटील यांनी केले,तर सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनिल पाटील यांनी केले.आभार कैलास कांजरेकर यांनी मानले.