नवापूर l प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात ब्रेक फेल झाल्याने कांद्यानी भरलेला ट्रक ५० फुट खोल दरीत कोसळल्याने चालकाचा मृत्यू झाला असून सहचालक गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताचे प्रमाण सुरु असुन आज दि ५ नोंहेंबर २०२२ रोजी मालेगाव नामपुर येथुन कांद्याचा ट्रक सकाळी ७:३० वाजता राजस्थान गंगापूर येथे जात असतांना चरणमाळ घाटाचा वळणावर फेल झाल्याने कांद्यानी भरलेला ट्रक (क्र. R.J.21.GC. 4771) घाटाचा खाली कोसळला.

यात यात ट्रक चालक हनुमान मोहनराम जाखळ रा.बिकानेर, राजस्थान यात मयत झाला तर सहचालक पुनमचंद गेनाराम सारंग रा. बिकानेर, राजस्थान हे वाहनातुन उडीमारल्याने त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही .चरणमाळ घाटात अपघाताची मालीका सुरु असुन यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही उपाय योजना केलेली नाही.
या ठिकाणी बोरझर गावातील पोलिस पाटील भिमा दावजी गावीत व बोरझर गावाचे ग्रामसुरक्षा दल यांनी घटनासळी मदत केली.घटनेची माहीती सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांना मिळताच घटनासळी उपनिरीक्षक मनोज पाटील,शाम पेढारे,गणेश बच्छे,प्रतापसिंग वसावे यांनी घटनेचा पंचनामा केला.मयत चालकाला १०८ रुग्णवाहीकेने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नवापूर पोलिस ठाण्यात भादवी कलम 304(अ),279,338 वैगरे प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी घाटात गतिरोधक बसवले परंतु त्याचा काहीसा उपयोग होताना दिसून येत नाही. दुरुस्तीचा प्रस्तावाला देखील गती मिळत नसल्याने निष्पाप लोकांचा बळी जात आहे. चरणमाळ घाटातील अपघात सत्र कधी थांबेल असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.









