Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे बापरे ..ठाणेपाडा आश्रमशाळेची विहिर हरवली

team by team
July 22, 2022
in राजकीय
0
अरे बापरे ..ठाणेपाडा आश्रमशाळेची विहिर हरवली

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा आश्रमशाळेसाठी पाणी पुरवठा करणारी विहिर हरवण्याची घटना घडली आहे.हा प्रताप चक्क पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.बाविस्कर यंानी केला आहे.त्यांनी विहिर खोदण्यात आली. मात्र त्यास पाणी लागले नसल्याचा अभिप्राय संबंधित इतिवृतात नोंदविला होता.मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी विहिरच खोदण्यात आली नसून खोदकाम झाले नाही तर पाणी लागणार कसे? असा संतप्त सवाल जि.प.सदस्यांनी उपस्थित केला.

नंदुरबार जि.प.ची स्थायी समिती सभा जि.प.च्या याहामोगी सभागृहात संपन्न झाली. यावेळी अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला बालकल्याण सभापती निर्मला राऊत, सभापती गणेश पराडके, अजित नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

 

यावेळी सभेदरम्यान पाणी पुरवठा विभागाचा आढावा सादर केला जात असतांना ठाणेपाडा आश्रमशाळेसाठी पाणी पुरवठा करणारी विहिर खोदण्यात आली. मात्र त्यास पाणी लागले नसल्याचा अभिप्राय संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.बाविस्कर यांनी इतिवृतात नोंदविला होता. यावर जि.प.सदस्य देवमन पवार यांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी विहिरच खोदण्यात आली नसून खोदकाम झाले नाही तर पाणी लागणार कसे? असा सवाल उपस्थित केला. यावर श्री.बाविस्कर यांनी सदस्यांच्या प्रश्नाला बगल देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सभागृहात खोटी माहिती दिल्याने संबंधित अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सभागृहातील लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर करण्यात यावा, सभागृहाची दिशाभूल करु नका, प्रत्येक विभाग प्रमुखाने स्वत: खात्री करुन मगच अहवाल सादर करा, कागदी घोडे नाचवू नका अशा सूचना दिल्या.

दरम्यान अंगणवाडी भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, असा जिल्हा परिेषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव झाला असतांनाही त्याची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी धडगाव परिसरात यामुळे हाणामार्‍या होत असून अनेकदा वाद होतात. यामुळे सदरची बाब गांभीर्याने घेण्याची मागणी जि.प.सदस्य विजय पराडके यांनी केली. यावर महिला बालकल्याण अधिकारी कृष्णा राठोड यांनी शासन निर्णयात पाडा असा शब्दप्रयोग नसल्याने त्याचा समावेश करण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती दिली. यावर विजय पराडके यांनी सदरची बाब गांभीर्याने घेतली नाही आणि वाद उद्भवला तर मृतदेहच कार्यालयात ठेवणार असल्याचा इशारा दिला.

बातमी शेअर करा
Previous Post

पदवीधर, शिक्षक मतदारसंघ मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम घोषित

Next Post

माजी आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते गवळी वाड्यातील मरीमाता मंदिर जिर्णोद्धार लोकार्पण सोहळा

Next Post
माजी आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते गवळी वाड्यातील मरीमाता मंदिर जिर्णोद्धार लोकार्पण सोहळा

माजी आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते गवळी वाड्यातील मरीमाता मंदिर जिर्णोद्धार लोकार्पण सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add