Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पिक विम्यासाठी नंदुरबार तालुक्यातील २० गावातील २०० शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, भरपाई न दिल्यास बेमुदत उपोषण

Mahesh Patil by Mahesh Patil
July 4, 2022
in क्राईम
0
पिक विम्यासाठी नंदुरबार तालुक्यातील  २० गावातील २०० शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, भरपाई न दिल्यास बेमुदत उपोषण

नंदुरबार l प्रतिनिधी

पिक विमा योजनेने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत. गेल्या वर्षी नंदुरबार तालुका दुष्काळ घोषित असतांना देखील पिक विम्याची रक्कम संबंधित कंपनीने देण्यास टाळाटाळ केली. विमा योजनेतुन पूर्ण नुकसान भरपाई न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

पिक विमा योजनेची चौकशी होऊन नुकसान भरपाई मिळावी यासाठी नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली, मांजरे, भादवड,ओसरली, शनिमांडळ, वावद, रनाळे,दहिंदुले,जून मोहिदे, हाटमोहिदे या गावांसह १५ ते २० गावातील २०० शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन दिले.

 

यावेळी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कृष्णदास पाटील,सागर इंदानी,दिलीप पाटील,शरद पाटील, पवन काकड, गणेश पाटील,रोहिदास राजपूत, नारायण पाटील,नागेश्वर राजपूत, सचिन शिंदे,बाजीराव मराठे,पवन मराठे,राजाराम पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची भेट घेऊन चर्चा केली. मागील वर्षी पिक विमा काढला होता. शेतातील नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनामा पिक विमा कंपनी कडून करण्यात आला होता.

 

त्या अनुशंगाने विम्याची पिक कापणी प्रयोग तसेच २०२०-२०२१ वर्षाचे पीक घटाच्या आधारे रक्कम मिळणे क्रमप्राप्त असतांना देखील पिक विमा कंपनीने अजून पर्यंत कुठल्याही प्रकारचा नुकसान मोबदला दिलेला नाही. रक्कम कापणी प्रयोगा प्रमाणे शासनाच्या निर्देशनुसार पूर्ण दिलेली नाही त्यामुळे योग्य ती चौकशी होऊन विमा कंपनीला त्वरित नुकसान भरपाईचे निर्देश द्यावेत. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर असंख्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

मागील वर्षी नंदुरबार तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला होता.पिक आणेवारी नुसार नुकसान भरपाई मिळावी. नुकसान झालेल्या पिकांच्या विमा कंपनीने शेतकऱ्यांना २ हजार,३ हजार ते ५ हजार अशी रक्कम दिली आहे. पूर्ण रक्कम देण्यास कंपनी टाळाटाळ करीत आहे.भरपाई न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण करण्यात येईल असे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कृष्णदास पाटील यांनी सांगितले

अंदाजीत विम्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

पिक विम्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत. हेक्‍टरी २ हजार,३ हजार,५ हजार रुपये विमा मिळाला आहे. पीक विम्याची संपूर्ण नुकसान भरपाई मिळणे क्रमप्राप्त आहे. संबंधित कंपनीने अंदाजीत विमा काढून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला.
सागर इंदाणी,
शेतकरी, कोपर्ली

बातमी शेअर करा
Previous Post

चरणमाळ घाटात बसचा भीषण अपघात, २० प्रवासी जखमी

Next Post

पिकविमा परताव्यात मोठी तफावत समितीची तात्काळ बैठक घेवून शेतकर्‍यांना न्याय द्यावा : बिपीन पाटील

Next Post
पिकविमा परताव्यात मोठी तफावत समितीची तात्काळ बैठक घेवून शेतकर्‍यांना न्याय द्यावा : बिपीन पाटील

पिकविमा परताव्यात मोठी तफावत समितीची तात्काळ बैठक घेवून शेतकर्‍यांना न्याय द्यावा : बिपीन पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2025, मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर : डॉ. मित्ताली सेठी

नायलॉन मांजा: वापरासाठी 50 हजार, तर विक्रीसाठी अडीच लाखांचा दंड प्रस्तावित

December 31, 2025
जुगार अड्ड्यावर धाड, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोन राज्यातील 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जुगार अड्ड्यावर धाड, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोन राज्यातील 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

December 31, 2025
नंदुरबारात शिवसेना शिंदे गटाचा महाविजयी सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ

नंदुरबारात शिवसेना शिंदे गटाचा महाविजयी सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ

December 29, 2025
द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये संस्कार, कला व गुणवत्तेचा उत्सव, सांस्कृतिक महोत्सव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये संस्कार, कला व गुणवत्तेचा उत्सव, सांस्कृतिक महोत्सव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

December 29, 2025
बांगलादेशावर निर्बंध घालण्यासह तेथील कट्टरतावादी गटांवर कारवाईची हिंदू संघटनांनी मागणी

बांगलादेशावर निर्बंध घालण्यासह तेथील कट्टरतावादी गटांवर कारवाईची हिंदू संघटनांनी मागणी

December 27, 2025
शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही,लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या इशारा

शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही,लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या इशारा

December 27, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group