नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात गुजरात डेपोची बस मालेगाव हून सुरत जात असताना एक्सेल तुटल्याने ब्रेक निकामी झाल्यानंतर अपघात झाला यात २० प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे.
गुजरात परिवहन विभागाची एसटी बस ( क्र.G.J.18, Z.5650) मालेगाव हुन सुरतला जात असताना सकाळी ९.३० वाजे दरम्यान महाराष्ट्र गुजरात सीमेवरील चरणमाळ घाटात बसच्या पुढच्या चाकांचा एक्सेल तुटल्याने ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला आहे. चालकाच्या प्रसंगावधानाने ब्रेक निकामी झाल्यानंतरही बस वरील ताबा न सोडता रस्त्याच्या कडेला बस उभी करण्याचा प्रयत्न केल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.
या बस मध्ये २८ प्रवासी होते.यात ७ प्रवाशाना जबर मार लागल्याने त्यांना १०८ रुग्णवाहीकेने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यात बसचे चालक लक्ष्मनसिंग बलवंत रणावत व वाहक विलास भाऊजीभाई वसावा रा. छापटी, उच्छल ,सुरत डेपो (वय ४८) यांना पायाला किरकोळ लागले आहे.घटनचे माहीती पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना मिळताच उपनिरीक्षक मनोज पाटील,पो हे का गणेश बच्छे,विनोद पराडे,प्रतापसिंग वसावे,प्रमोद वंजारी,नामदेव राठोड व पोलिस पाटील बोरझर यांनी जखमीना बाहेर काढुन १०८ रुग्णवाहीकेत टाकले.
चरणमाळ घाटात २ दिवसात ही दुसरी घटना आहे.नवापूर तालुक्यात दोन दिवसा पासुन समाधान कारक पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यावर ओलावा निर्माण झाल्याने वाहनाचे ब्रेक लागत नाही.
या बस मध्ये प्रवासी धर्माबाई वाघ रा.सुरत,सोनी अजय मोरे रा.पिंपळनेर, नजमा मुलताक अहमत ( वय ३७) रा.मालेगाव, गुलामनबी होरा ( वय ८४) रा. बडोदा, जुबेदा गुलामनबी होरा (वय ८०) रा. बडोदा, हिना कौसल लयत अहमत (वय २५) रा. मालेगाव, शहा शफिक दादामीया (वय ४३) रा. कुसुंबारोड मालेगाव, सलिम शहा इसाक (वय ६२) रा.सामोडे, पिंपळनेर हे सात प्रवासी जखमी झाले आहे. यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदिप गावीत,सिस्टर निर्मला गावीत,जोयस वळवी,तेजल गावीत,सिमा वळवी,हेमलता जाधव यांनी उपचार केले.
बस मध्ये नसरीन शेख (वय ४५) रा. बारडोली, सलिम शेख (वय ५५ ) रा. बारडोली, रामदास बागुल (वय ४८) रा.मालेगाव, शहा शपीक दादामीया (वय ४३) रा. मालेगाव, रामदास खैरणार (वय ५५) रा.मालेगाव, सलिम शहा इशाक शहा( वय ६२) रा. पिंपळेर, युनुस हाजी सरोपोदीन (वय ५०) रा. दाभाडी , महमत हारुन अब्दुल वाहीत (वय ३५) रा.मालेगाव, मंगला मुंकुद पोतदार ( वय ५५ ) रा. सुरत, मोहमत अनसारी ( वय ५३) रा. मालेगाव, मुमताज बी अनसारी (वय ४५) हे किरकोळ जखमी झाले आहे.
पंरतु हे प्रवासी मिळेल त्या वाहनाने गुजराथ राज्यात निघुन गेले.या घाटात दोन दिवसा पुर्वी पेट्रोल व डिझेल टॅकरच्या अपघात होऊन टँन्कर या जागेवर घाटाचा खाली कोसळले होते.दोन दिवसा पुर्वी चरणमाळ घाटाचा खाली बोरझर गाव आहे.
या ठिकाणी पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी बैठक घेऊन ग्रामसुरक्षा दल स्थापन केले होते.पंरतु आज झालेल्या अपघातात ग्रामसुरक्षा दलचा एक पण जवान या ठिकाणी दिसुन आला नाही.या घाटात अपघाताची मालीका सुरुच असुन यावर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.