Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुर्गम भागात अधिकृतरित्या मोबाईल टॉवर उभारणाऱ्या कंपन्यांना सहकार्य करण्याची जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची सूचना

team by team
June 28, 2022
in राज्य
0
जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण व दुर्गम भागात काही ठिकाणी पुरेसे मोबाईल टॉवर नसल्याने अशाठिकाणी मोबाईल लहरी पोहचत नाही. त्यामुळे अनेक नागरिक तसेच व्यवसायिकांना एकमेकांशी संपर्क साधण्यात अडचणी उद्भवतात. या अडचणी सोडविल्या जाव्यात. तसेच जिल्ह्यातील दुर्गम भागात संपर्क यंत्रणा उभी रहावी, यासाठी काही मोबाईल कंपन्या शासन नियमांचे पालन करून टॉवर उभारणाऱ्यास तयार आहेत. या अधिकृतरित्या व शासन नियमांचे पालन करून मोबाईल टॉवर उभारणाऱ्या कंपन्यांना आवश्यक ते सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात मोबाईल टॉवर उभारणी संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, गिरीश वखारे, ज्ञानेश्वर सपकाळे, मिलिंद कुळकर्णी तसेच सर्व गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते.

श्रीमती खत्री म्हणाल्या की, भारत संचार निगम लिमिटेड तसेच जिओ कंपनीमार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी नवीन मोबाईल टॉवर बसविण्यात येत आहे. परंतू सदर कंपन्यांना मोबाईल टॉवर उभारण्यासाठी अडचणी येत आहे.

त्या अडचणी त्वरीत सोडविण्यासाठी ज्या ग्रामपंचायतीने अद्यापही कंपन्याना टॉवर उभारणीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र दिलेले नाहीत. अशा ग्रामपंचायतीने शासन नियमांचे पालन करून ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात यावेत. यासाठी गट विकास अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा.

तसेच खाजगी मालकांनी त्यांच्याकडे जागा उपलब्ध असल्यास टॉवर उभारण्यासाठी कंपन्यांना जागा उपलब्ध करुन द्यावी. ज्या ठिकाणी खाजगी जागा उपलब्ध नसेल अशा ठिकाणी ग्रामपंचायत, नगरपालिकेने तरतुदींचे पालन करून जागा उपलब्ध करुन द्यावी. दुर्गम भागात जागेची अडचणी येत असल्यास वन विभागाने जागा उपलब्ध करुन द्यावी. महावितरणने कंपन्यांना विजेची सोय उपलब्ध करुन द्यावी.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी कंपनीच्या प्रतिनिधीशी चर्चा करुन येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेतल्या. बैठकीस महावितरण, बीएसएनएल तसेच जिओ कंपन्याचे प्रतिनिधी तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

अरे बापरे : शेतकरी बांधवांच्या सावधानतेने अनर्थ टळला

Next Post

शहादा तालुक्यातील गुन्हेगारी टोळीतील 5 इसम 2 वर्षांसाठी जिल्ह्यातुन हद्दपार

Next Post
जेष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जेष्ठ नागरिक कक्षाची स्थापना: पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील

शहादा तालुक्यातील गुन्हेगारी टोळीतील 5 इसम 2 वर्षांसाठी जिल्ह्यातुन हद्दपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add