Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा येथे नवीन १२५ क्षमतेचे आदिवासी मुलां मुलींकरिता स्वतंत्र दोन वसतिगृह सुरु करा : आमश्या पाडवी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Mahesh Patil by Mahesh Patil
June 3, 2022
in राजकीय
0
अक्कलकुवा येथे नवीन १२५ क्षमतेचे आदिवासी मुलां मुलींकरिता स्वतंत्र दोन वसतिगृह सुरु करा : आमश्या पाडवी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा येथे १२५ क्षमतेचे मुलामुलींसाठी स्वतंत्र दोन वस्तीगृह सुरू करावे अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

आमश्या पाडवी यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असून यातील आदिवासी मुलां-मुलींच्या शिक्षणाकरिता राज्यात विविध ठिकाणी आदिवासी विकास विभागामार्फत मुला-मुलींचे वसतिगृह चालविले जातात तेथे राहण्याची व भोजनाची व्यवस्था होऊन आदिवासी मुलां-मुलींना उच्च शिक्षण घेता येते.

अक्कलकुवा तालुक्यात खापर, वाण्याविहीर, मोलगी व अक्कलकुवा हया तालुक्याच्या ठिकाणी १९७७ पासून ७५ मुलांच्या क्षमतेचे वस्तीगृह चालू आहे. तळोदा येथे मुलांचे तीन व मुलींचे दोन वसतिगृह कार्यान्वित आहेत. तेथे फक्त कला विज्ञान वाणिज्य व समाजकार्य महाविद्यालये आहेत.

तर अक्कलकुवा येथे विविध डिप्लोमा, इंजिनिअरिंग, विधी,(एल.एल.बी) औषध निर्माण शास्त्र, दोन शिक्षणशास्त्र महाविद्यालये दोन डी.एड तसेच कला, विज्ञान, वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालये व ४ कनिष्ठ महाविद्यालये कार्यान्वित आहेत.

वरील प्रमाणे शिक्षणाची सुविधा उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणावर आदिवासी मुले-मुली वरील अभ्यास क्रमांना प्रवेश घेतात परंतु वसतिगृहाची क्षमता अत्यंत तोडकी असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक तसेच शैक्षणिक तणावाला सामोरे जावे लागते व मध्येच निवास व भोजन व्यवस्था नसल्याने शिक्षण सोडावे लागते.

गेल्या ४४/४५ वर्षात तालुक्याचा संपूर्ण चेहरा बदललेला आहे. शिक्षणाचा सोयी उपलब्ध झालेल्या आहेत. परंतु आदिवासी दुर्गम भागातील मुला-मुलींना या प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या निवास व भोजनासाठी वसतिगृह अत्यंत आवश्यक आहेत जेणेकरून दुर्गम भागातील आदिवासी मुला-मुलींची गुणवत्ता जगासमोर येईल.व ते मुख्य प्रवाहात येऊन जगाशी स्पर्धा करतील.

आता युद्ध पातळीवर मुलांकरिता व मुलींकरिता स्वतंत्र १२५ क्षमतेचे वसतिगृह ताल्काळ मंजूर करून शिक्षणाच्या प्रवाहात येऊ पाहणाऱ्या दुर्गम भागातील मुला-मुलींना न्याय द्यावा व त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे अशी मागणी शेवटी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी केली आहे.यावेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रविंद्र गुरव, युवा सेना जिल्हाधिकारी ललित जाट, तालुका प्रमुख मगन वसावे, तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी आदि उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

बालिका आश्रमातुन २ अल्पवयीन मुलींचे अपहरण

Next Post

जिल्ह्यात 1 लाख 30 हजार लाभार्थ्यांना मिळाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ, पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी हे करा

Next Post
जिल्ह्यात 1 लाख 30 हजार लाभार्थ्यांना मिळाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ,  पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी हे करा

जिल्ह्यात 1 लाख 30 हजार लाभार्थ्यांना मिळाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ, पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी हे करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2025, मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर : डॉ. मित्ताली सेठी

नायलॉन मांजा: वापरासाठी 50 हजार, तर विक्रीसाठी अडीच लाखांचा दंड प्रस्तावित

December 31, 2025
जुगार अड्ड्यावर धाड, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोन राज्यातील 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जुगार अड्ड्यावर धाड, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोन राज्यातील 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

December 31, 2025
नंदुरबारात शिवसेना शिंदे गटाचा महाविजयी सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ

नंदुरबारात शिवसेना शिंदे गटाचा महाविजयी सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ

December 29, 2025
द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये संस्कार, कला व गुणवत्तेचा उत्सव, सांस्कृतिक महोत्सव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये संस्कार, कला व गुणवत्तेचा उत्सव, सांस्कृतिक महोत्सव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

December 29, 2025
बांगलादेशावर निर्बंध घालण्यासह तेथील कट्टरतावादी गटांवर कारवाईची हिंदू संघटनांनी मागणी

बांगलादेशावर निर्बंध घालण्यासह तेथील कट्टरतावादी गटांवर कारवाईची हिंदू संघटनांनी मागणी

December 27, 2025
शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही,लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या इशारा

शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही,लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या इशारा

December 27, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group