नवापूर l प्रतिनिधी
मे महिन्यात उन्हाचा तडाका सुरु असुन पारा ४४ ते ४५ पर्यत जात आहे.यातच नवापूर शहरातील लाखानी-पार्क,लालबारी,शास्त्रीनगर,मेमनगल्ली,धडधडया,देवफळी, भागात पाणी टंचाई असल्याने आज त्या परिसरातील रहिवाशांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख यांचा नेतृत्वात हंडा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी मुख्यधिकारी यांच्या दालनात हंडा घेऊन खाली जमीनीवर बसुन दोन तास ठिय्या आंदोलन केले. जो पर्यत आम्हाला पाणी मिळत नाही तो पर्यत आम्ही मुख्यधिकारी यांच्या दालनातुन जाणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. शास्त्रीनगर,लाखानी पार्क,देवळफळी या भागात पाणी टंचाई असतांना नगरसेवक बाहेर गावी फिरायला गेले हे बरोबर नाही.ज्या विश्वासाने जनतेने तुम्हाला निवडुन दिले आहे.या जनतेला पाण्या विना सोडुन खुशाला मजा मारत आहे असा आरोप भाजपचे एजाज शेख यांनी केला ते पुढे म्हणाले की, आम्ही दोन तासा पासुन मुख्यधिकारी यांच्या दालनात धरणे आंदोलन केले. पण नवापूर नगरपालिकेचा एक ही लोकप्रतिनीधी उपस्थिती झाले नाही मुख्यधिकारी पण उपस्थित नाही ही नगर पालिका बेवारस झाल्याचे दिसत आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे.ही पालिका जनतेसाठी आहे की दुसऱ्या कोणासाठी आहे असा सवाल एजाज शेख यांनी केला.
नवापूर शहरात ज्या भागा मध्ये पाणी टंचाई आहे.त्यांचा प्रश्न दोन दिवसात मार्गी लावू असे लेखी आश्वासन प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार यांना दिले.यावेळी भाजपचे राजेद्र गावीत,एजाज शेख,रमला राणा,जाकीर पठाण,जयंतीलाल अग्रवाल,हेमंत जाधव,निलेश प्रजापत,माजी नगरसेविका सुनिता वसावे,दुर्गा वसावे,स्वप्निल मिस्त्री,तोसिफ मन्सुरी,भाविन राणा,लाखाणी पार्क रहिवाशी परवेज लाखाणी, सुरेंद्र वळवी,शाहऱुख खाटीक,अबिदा खाटीक, अश्वमेघा वसावेसह आदी उपस्थित होते.








