म्हसावद l प्रतिनिधी
एटीएम कार्ड अर्थात आपले बँक खाते ज्या बँकेत उघडले असणार,त्या बँकेतून आपणास दैनंदिन आर्थिक व्यवहार करण्याकरिता बँक मार्फत डेबिट व क्रेडिट कार्ड एटीएम कार्ड दिले जाते. त्या एटीएम कार्डतून आपणास आपला व्यवहार हा प्रत्येकी जीवनाश्यक गरजांचा वस्तू खरेदी वेळी लागणाऱ्या आर्थिक पैशांसाठी सहजपणे कधीही व कुठेही वापरू शकतो. एटीएम कार्ड हे आर्थिक व्यवहारातील अविभाज्य घटक झाला असून.त्याच्याच वापरातून प्रत्येकी बँक ही त्या-त्या खातेधारकांना आपल्या बँकेतून देत असते.परंतु बऱ्याच व्यक्तींना ही माहिती पुरवली जात नाही. किंवा एटीएम कार्डही धारक हा शिक्षित असूनही माहिती नसते, अशिक्षित त्यांचा तर विषय हा बाजूला असतो.
आज एटीएम कार्ड धारकांना माहिती असणे गरजेचे आहे ते म्हणजे एटीएम कार्ड च्या बँकेतून खाते उघडल्यावर आपणास मिळते त्याला त्याच्या विमा इन्शुरन्स हा काढला जातो बँक खाते उघडले वेळी त्याचा लाभ अपघातात मृत्यू पावल्यास त्या मृत व्यक्तीच्या वारसास पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी, बहीण इत्यादी रक्त नाते संबंधित असतात त्यांनाच खाते उघडणे वेळी नॉमिनेशन च्या रकान्यात नाव लावले आहे.त्यास व्यक्तीचे नावाने त्या मृत व्यक्तीच्या वारस धारकास ही रक्कम रुपये दोन लाख त्यांना प्राप्त होते.
युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शहादा यांच्यामार्फत अपघातात पावलेल्या दोन व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी दोन लाखाचा धनादेश देण्यात आला. यात मृत भाऊसाहेब अर्जुन खैरनार,(वय.50 ) रा. रेणुका माता मंदिर शेजारी डी. जे. पी. नगर.नाशिक पुणे रोड नाशिक त्यांचा मृत्यू आग्रा मुंबई हायवे वर चांदवड ता.चांदवड येथे कार अपघात त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी मानसी भाऊसाहेब खैरनार यांच्यासह राकेश प्रल्हाद पटेल, (वय.31) रा.मोहिदा त.श.ता.शहादा यांचा गुजरात राज्यातील हायवेवर कारमध्ये जागीच मृत्यू झाला.त्यांचे वारस म्हणून त्यांची आई विद्या प्रल्हाद पटेल,यांना एटीएम अपघात विमा पॉलिसी तून प्रत्येकी दोन लाख रुपयांचा चेक वारसास युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शहादातर्फे शाखा व्यवस्थापक वसंत भामरे, डेप्युटी शाखा प्रबंधक अभिजित देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कृषी अधिकारी प्रणय काळे, जनरल बँक ऑफिसर सुनील पाडवी, बँक कॅशियर कंचन गायकवाड, मदतनीस आनंदा कोळी, सुरक्षा गार्ड मोहन रमेश भामरे, इत्यादी उपस्थित होते.
ए.टी.एम लाभधारक हा मृत होण्याच्या अगोदर कमीत कमी तीन महिने पहिले एटीएम मधून बँक खात्यातून व्यवहार झाला पाहिजे असावा.तरच एटीएम विमा पॉलिसीतून ग्राह्य धरले जाते. या एटीएम विमा पॉलिसी अपघात विमा कागदपत्रांचे फारच किचकट नियमावली असते,ती पूर्ण करूनच समोरच्या व्यक्तीस लाभ घेता येतो.
वसंत भामरे
शाखा व्यवस्थापक,युनियन बँक ऑफ इंडिया,शहादा.