तळोदा l प्रतिनिधी
बिबटने झोपडीत शिरून एक शेळी व पांच कोबड्यांवर हल्ला चढवून फस्त केल्याची घटना गुलीआंबा येथे दिं.18 रोजी रात्री घडली वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी मागणी केली आहे. बिबट संचार मुळे भीतीचे वातावरण आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील गुलीआंबा येथील रहिवासी दिलीप नोबल्या पाडवी यांच्या घरात दि.18 फेब्रुवारी रोजी रात्री अचानक बिबट्याने शिरकाव करून पाच ते सहा कोंबड्या वर व एका शेळीवर हल्ला करून फस्त केले तरी या घटनेमुळे दिलीप नोबल्या पाडवी यांचे बरेच नुकसान झाले असून त्यांना शासनाच्या संबधित विभागाकडून आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे व बिबट चा बंदोबस्त करावा अशीही मागणी करण्यात आली आहे.