म्हसावद l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय इंग्रजी विभाग व इंग्लिश लँग्वेज टीचर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ह्यूमन रिलेशनशिप्स इन लिटरेचर अँड सोसायटी: प्री अँड पोस्ट पँडेमिक परस्पेक्टिव्ह ‘ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे प्रभारी कुलगुरू प्रा.डॉ .बी.व्ही पवार उद्घाटक म्हणून लाभले. आपल्या ‘उदघाटनपर मनोगतात त्यांनी साहीत्य व भाषा यांचे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्वाचे स्थान आहे, असे प्रतिपादन केले.व ज्वलंत विषयावर परिषद आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आर. एस. पाटील यांनी भूषविले. इंग्लिश लँग्वेज टिचर असोसिएशन, खान्देश चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. वैभव सबनीस यांनी परिषेदेचा उद्देश व गरज या बाबत माहिती दिली. इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ एस. डी. सिंदखेडकर यांनी महाविद्यालय व इंग्रजी विभाग यांनी गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. प्रथम व्याख्याते प्रसिद्ध आर्टिस्ट डॉ. विमी मनोज यांनी व्याख्यानाची सुरुवात “एके दिवशी मी सर्व जग रंगांनी व शब्दांनी रंगवून टाकेन” या काव्यात्मक शब्दांनी केली. साहित्यातील विविध उदाहरणे देऊन त्यांनी साहित्य व समाज यांचा संबंधांचे विस्तृत विवेचन केले. या व्याख्यान सत्राला विशेष अतिथी म्हणून कबाचौउमवि इंग्रजी भाषा विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ. मुक्ता महाजन ह्या लाभल्या होत्या. सोलापूर विद्यापीठाचे प्रा.डॉ.मनोहर जोशी आपल्या व्याख्यानातून विविध साहित्यांचा आढावा घेतला व सुंदर कविता वाचनाने व्याख्यानाचा शेवट केला. या सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अशोक खैरनार यांनी प्रा.डॉ. मनोहर जोशी यांच्या अभ्यासपूर्ण व्याखानाची प्रशंसा केली. तिसरे व्याख्याते डॉ. वासुदेव पॉल, दार्जलिंग यांनी पेंडेमीक व त्याचा साहित्यावरील प्रभाव यांचा संबंधांचे विवेचन केले. या सत्राला अध्यक्ष म्हणून डॉ. धीरज चव्हाण हे लाभले. व्याख्यानानंतर पेपर सादरीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. विविध राज्यांतील 46 संशोधकांनी आपले संशोधन पेपर ऑनलाईन सादर केले. या परिषदेसाठी विविध राज्यांतून 308 विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. डॉ. वैभव सबनीस यांनी या सत्राचे नियोजन केले होते. पेपर सादरीकरणासाठी समांतर पाच गटात सहभागी संशोधकांची विभागणी करण्यात आली होती. प्रथम गटाचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. संतोषकुमार पाटील यांनी भूषविले.दुसऱ्या गटासाठी डॉ. कल्ल्याण कोकणे हे अध्यक्ष म्हणून लाभले होते. तिसऱ्या गटाचे अध्यक्ष डॉ. दीपक देवरे हे होते.चौथ्या गटासाठी डॉ. दीपक चौधरी यांनी अध्यक्ष म्हणून कामकाज बघितले तर पाचव्या गटासाठी डॉ. सरबजीत चीमा ह्या अध्यक्ष म्हणून लाभल्या होत्या. समारोप सत्राला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमळनेरच्या प्रा. डॉ. ज्योती राणे हया लाभल्या होत्या. त्यांनी सर्व व्याख्यानांचा आढावा घेतला. सूत्रसंचलन प्रा. खुमानसिंग वळवी व प्रा. आर. एस. माळी यांनी केले. प्राध्यापिका संगीता पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू डॉ. जी. एस. गवई यांनी सांभाळली.
या परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. आर.एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांनी कौतुक केले.