नंदुरबार | प्रतिनिधी
बिलाडी- नारायणपूर रस्ता पूर्ववत करा अशी मागणीचे निवेदन भारतीय किसानतर्फे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना देण्यात आले.
रेल्वे प्रशासनाने एल.सी.गेट नं .८७ बिलाडी – नारायणपुर रस्ता बंद करुन अंडरग्राऊंड रस्त्याची निर्मिती केली होती . त्यानंतर सदर रस्ता सुरु झाला . परंतु त्यावेळी रेल्वे प्रशासनाने आमच्या काही शेतकर्यांना आश्वासन दिले होते की , आमचे काम झाल्यानंतर आम्ही सर्व शेतकर्यांसाठी हा रस्ता चांगल्या दर्ज्याचा बनवुन देवू . परंतु काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासन सदर रस्ता तसाच सोडून निघुन गेले . यासाठी आमचे सर्व शेतकरी बांधव मागील २ वर्षांपासून अनेक अडचणींचा सामना करीत आहेत . तेथुन शेतमाल ने – आण करतांना ट्रक व ट्रॅक्टर आणतांना तारेवरची कसरत करावी लागते . यामुळे अनेकदा ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण बिघडून अपघात होवुन जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत .२१२२ यासाठी रेल्वे प्रशासनाने एल.सी. गेट नं . ८७ बिलाडी – नारायणपुर रस्त्यावर येवून आमचे काही शेतकरी बांधवांशी विचार – विनिमय करुन आमच्या समस्येचे निराकरण करावे यासाठी आम्ही रेल्वे प्रशासनाला वेळोळी पत्रव्यवहार करुन देखील रेल्वे प्रशासनाने आमच्या मागणीकडे काही एक लक्ष दिले नसून आमच्या मागणीला केराची टोपली दाखविली आहे . बिलाडी – नारायणपुर रस्ता बंद केला असून तो सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील ते सुरु न केल्या मुळे आमच्या शेतकरी बांधवांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. जर मागणी मान्य झाली नाही तर आमचे शेतकरी बांधव येत्या काळात रेल रोको करण्याच्या प्रयत्नात आहेत . तसे काही झाल्यास त्यास सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार राहील असे सांगण्यात आले .या बाबतचे निवेदन शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना देण्यात आले. यावेळी किसान सेनेचे प्रदेश उपाद्यक्ष पंडित तडवी, जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी भटके विमुक्त जिल्हाद्यक्ष कांतीलाल जाधव ,शहराध्यक्ष राजेश नानाभाऊ माळी , कैलास झगा माळी हिंमत सोमा माळी गंगाराम शामजी माळी मधुकर माळी कैलास माळी आदी उपस्थित होते.










