Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यातील 45 हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 38 कोटींची मदत, महाविकास आघाडी शासनाचा दिलासा

team by team
December 9, 2021
in कृषी
0
जिल्हाभरात अवकाळी पावसामुळे ६२४ हेक्टर पीकांचे नुकसान

नंदुरबार l प्रतिनिधी
अतिवृष्टी, गारपीट व पुरामुळे झालेल्या शेत पिकाच्या नुकसानी पोटी महाविकास आघाडीच्या सरकार काळात कोरोनाच्या संकटकाळात जिल्ह्यातील 45 हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना मदतीचा हात दिल्याने बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 38 कोटी रुपयापेक्षा अधिक मदतीचे वाटप करण्यात आले.

जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोंबर 2019, जून ते ऑक्टोंबर 2020 आणि जून ते ऑक्टोंबर 2021 या कालावधीत अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे यंत्रणेमार्फत करण्यात आले. या नुकसानीची भरपाई जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मिळावी याकरिता राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

जुलै ते ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत 12 हजार 150 शेतकऱ्यांना 16 कोटी 52 लाख 35 हजार 406 रुपयाची मदत देण्यात आली. यात नंदुरबार तालुक्यात 4 कोटी 658 लाख 803 (2754 शेतकरी), नवापूर 53 लाख 68 हजार 290 (1135 शेतकरी), शहादा 6 कोटी 99 लाख 52 हजार 500 (3361 शेतकरी), तळोदा 2 कोटी 83 लाख 41 हजार 240 (2699 शेतकरी), अक्कलकुवा 96 लाख 34 हजार 573 (1100 शेतकरी) आणि अक्राणी तालुक्यात 54 लाख 28 हजार (1101 शेतकरी) अशा एकूण 12 हजार 150 कोरडवाहू व बागातदार शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले.

जून ते ऑक्टोंबर 2020 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत 24 हजार 839 शेतकऱ्यांना 15 कोटी 97 लाख 34 हजार 914 रुपयांची मदत देण्यात आली. नंदुरबार तालुक्यात 59 लाख 47 हजार 327 (974 शेतकरी), नवापूर 1 कोटी 59 लाख 71 हजार 200 (4842 शेतकरी ), शहादा 1 कोटी 38 लाख 97 हजार 787 (1992 शेतकरी ), तळोदा 88 लाख 53 हजार 350 (1489 शेतकरी), अक्कलकुवा 2 कोटी 65 लाख 53 हजार 400 (2838 शेतकरी ) आणि अक्राणी तालुक्यात 8 कोटी 85 लाख 11 हजार 850 (12704 शेतकरी) अशा एकूण 24 हजार 839 कोरडवाहू व बागातदार शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले.

7 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2021 या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीबाबत पहिला हप्त्याची रक्कम 5 कोटी 58 लाख 10 हजार निधीपैकी नंदुरबार तालुक्यात 1 कोटी 50 लाख 81 हजार 817 ( 3334 शेतकरी), नवापूर 33 हजार 609 (13 शेतकरी ), शहादा 3 कोटी 22 लाख 7 हजार 175 हजार (3913 शेतकरी ), तळोदा 1 लाख 54 हजार 500 (29 शेतकरी), अक्कलकुवा 5 लाख 62 हजार 445 (294 शेतकरी ) आणि अक्राणी तालुक्यात 49 लाख 43 हजार 100 (920 शेतकरी) अशा एकूण 8 हजार 503 कोरडवाहू व बागातदार शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले.

मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करताना मदतीच्या रक्कमेमधुन कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करु नये असे आदेश देण्यात आले होते. प्रशासनाकडून प्राप्त झालेली मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी तालुकास्तरावर नियेाजन करण्यात आले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

बऱ्हाणपूर • अंकलेश्वर रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने ४५ लाखाच्या अवैध मद्यासह ६३ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

Next Post

एकल कलाकारांनी अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करावे

Next Post
एकल कलाकारांनी अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करावे

एकल कलाकारांनी अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add