धडगाव l प्रतिनिधी
तालुक्यातील राजबर्डीहून धडगाव येथे आठवडे बाजारात धान्य विक्री व बाजारासाठी जात असलेल्या प्रवाशी गाडीचा ब्रेक फेल झाल्याने आज दि.६ रोजी अपघात झाला आहे.यात चार प्रवाशी गंभीर असून 13 प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दि.६ डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास धडगाव तालुक्यातील राजबर्डीहून धडगाव येथे आठवडे बाजारात धान्य विक्री व बाजारासाठी जात असताना खर्डा ते खटवळा रस्त्यावरील तीव्र उतारावर प्रवाशी जीप गाडीचा ( क्र.एम.एच.२३, ई.३०७९) ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. यात चार प्रवाशांना हातपायाला गंभीर दुखापत झाली आहे. 13 जखमी झाले आहे.जखमींना धडगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गंभीर रुग्णांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.गाडीत एकूण 25 प्रवाशी असल्याचे बोलले जात आहे. धान्य व प्रवाशी भरून गाडी धडगाव येथे जात अपघात झाला. नंदुरबार जिल्ह्यातील अवैध वाहतूकीने प्रवाश्यांचा अपघात होत आहे. संबंधित विभागाने अवैध वाहतुकीवर लक्ष केंद्रित करावे अशी मागणी होत आहे.








