नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरात सुरू असलेल्या खोडाई माता यात्रेत विनाकारण शांतता भंग करणाऱ्या 11 टवाळखोर मुलांविरुद्ध दामिनी पथकाने कारवाई केली.
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवन दत्त.एस यांचे मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाने तीन ऑक्टोंबर रोजी नंदुरबार शहर येथील खोडाई माता यात्रेत विनाकारण शांतता भंग करणारे 11 टवाळखोर मुलांविरुद्ध म.पो.का.कलम 112/117 अन्वये कारवाई केली आहे.
सदरची कारवाई दामिनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक माया राजपूत, पोहेकाॅ संगीता सांबळे, ज्योती पाटील, अमिता वसावे, मनिषा अहिरे यांनी केली असुन यात्रेत कोणीही टवाळखोरपणा करीत असेल किंवा महिलांची/मुलींची छेडछाड करीत असेल तर तात्काळ डायल 112 वर कॉल करावा किंवा दामिनी पथकास कळवावे, असे नंदुरबार पोलीस दलातर्फे महिलांना आवाहन करण्यात आले आहे.