Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नर्मदा किनाऱ्यावरील जीवन शाळांचे पावसामुळे नुकसान

team by team
May 16, 2024
in राज्य
0
नर्मदा किनाऱ्यावरील जीवन शाळांचे पावसामुळे नुकसान

नंदुरबार l प्रतिनिधी
देशात लोकसभेची धामधूम सुरू आहे.त्यात विविध घोषणांचा पाऊस पडत आहे.मात्र स्वातंत्र्यानंतर ही सातपुड्यातील दुर्गम भागातील मुलाच्या शिक्षणासाठी शाळा नसल्याने 30 वर्षापासून नर्मदा नवनिर्माण आंदोलनातर्फे अनेक ठिकाणी नागरिकांच्या सहकार्याने नर्मदा जीवन शाळा चालवण्यात येत आहेत. नुकतेच मुसळधार पावसामुळे या शाळांचे मोठे नुकसान झाले असून सुमारे सातशे विद्यार्थ्यांचा शिक्षणाच्या प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

नंदुरबार जिल्हा हा मागास असून जिल्ह्याला इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकांक्षीत जिल्हा घोषित केला होता.

 

 

 

नंदुरबार जिल्ह्यात स्थलांतर कुपोषण अशा अनेक समस्यांनी घेतला आहे त्यातच सातपुड्यातील दुर्गम भागात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कुठलीही सोय नसल्याने अनेक गावांमध्ये नर्मदा नवनिर्माण आंदोलनातर्फे याबाबत विविध मागण्या करून ही प्रशासन व शासन याकडे लक्ष देण्याचे गांभीर्य दाखवले नाही त्यामुळे सुमारे 30 वर्षांपूर्वी नर्मदा नवनिर्माण आंदोलनातर्फे धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील अनेक दुर्गम भागात कुडाच्या, पत्र्याच्या, कौलाच्या झोपड्या बांधून नर्मदा जीवन शाळा सुरू करण्यात आल्या. या शाळांना शासनाने मान्यता दिली मात्र कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत केली नाही. त्यामुळे या शाळा लोकवर्गणीतून सुरू होत्या याबाबत शासनाकडे अनेकदा पाठपुरावा करून ही शासनाने कुठलेही लक्ष दिले नाही. राज्यातील प्रथम क्रमांकाचे मतदान केंद्र याच नर्मदा जीवन शाळांमध्ये होते दरम्यान मतदानानंतर सायंकाळी आलेल्या सोसाट्याचा वारा व पावसामुळे मनीबेली, डनेल, थुवानी येथील नर्मदा जीवन शाळांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

 

सुदैवाने शाळांना सुट्टी असल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र शाळांचे नुकसान झाल्याने या ठिकाणी शिकत असलेल्या 700 विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न एरणीवर आला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण कसे द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. रोज सहा तास बोटीने प्रवास करून शिक्षणासाठी दुसरीकडे जाणे या विद्यार्थ्यांना शक्य नाही त्यामुळे शासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते हा यक्ष प्रश्न आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मोठ्ठी बातमी : 50 हजाराची लाच घेताना प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याला रंगेहात अटक

Next Post

सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा त्वरीत सादर करावा : मनीषा खत्री

Next Post
सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा त्वरीत सादर करावा : मनीषा खत्री

सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा त्वरीत सादर करावा : मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीसाठी आज सर्वपक्षीय शोकसभा

January 31, 2026
सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

January 31, 2026
मला मिळालेला पुरस्कार स्व.बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित : प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी

मला मिळालेला पुरस्कार स्व.बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित : प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी

January 30, 2026
भालेर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

भालेर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

January 29, 2026
भालेर ग्रामपंचायतीत सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

भालेर ग्रामपंचायतीत सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

January 29, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add