नंदुरबार l प्रतिनिधी
अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत पश्चिम रेल्वे ,मुंबई कार्यालया अंतर्गत 554 रेल्वे स्टेशन च्या पुनर्विकास कार्यक्रम तथा 1500 रोड ओवर ब्रिज व अंडरपास योजनेचा शिलान्यास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .
या कार्यक्रमाचे आँनलाईन उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी तर प्रमुख अतिथी म्हणुन रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. या कार्यक्रमाअंतर्गत निबंध व चित्रकला स्पर्धा इयत्ता 5 वी ते 7 वी वर्गाच्या लहान गट तर इयत्ता 8 वी ते 10 वी वर्गाच्या मोठ्या गटातुन आयोजित करण्यात आल्या. या दोन गटातुन अभिनव विद्यालयाच्या बारा विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली.
निबंध स्पर्धेच्या मोठा गट निबंध स्पर्धेत प्रथम ओम प्रशांत पाटील ,द्वितीय रोहन अनिल पाटील ,तृतीय कोमल मनिष मंडलिक आणि चित्रकला स्पर्धेत प्रथम स्निकेत गुलाबसिंग पाडवी ,द्वितीय प्रांजल जगदीश माने ,तृतीय मानव छोटु मोरे लहान गटातुन कल्याणी ईश्वर गवळे प्रथम ,दक्ष सुरेश चौधरी द्वितीय ,राशी लालसिंग राठोड तृतीय तर चित्रकला स्पर्धेतुन नेहा योगेश पवार प्रथम ,कल्याणी ईश्वर गवळे द्वितीय ,विद्या लक्ष्मण माळी तृतीय तर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संसदरत्न नंदुरबारच्या लोकप्रिय खासदार डॉ हिना गावीत व जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावीत यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.