नंदुरबार l प्रतिनिधी
मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा एक प्रामाणिक व सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्त्व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून जवळपास हजोरोंच्या मराठा समाज बांधव पायी मुंबई येथे दि.26 जानेवारी रोजी आझाद मैदानावर जाणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत नितीन जगताप यांनी दिली आहे.
तसेच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गुलाब महारू मराठे हे देखील दि.27 जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत मुंबई येथे उपोषणाला बसणार आहेत.
आरक्षणाची शेवटची लढाई असून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी मुंबई येथे आमरण उपोषण करणार आहेत. सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांनी मुंबई येथे यावे असे आवाहन केले आहे. नंदुरबार येथून सकल मराठा समाजातर्फे शनिवार दि.20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, धुळे रोड, नंदुरबार येथे सर्व समाज बांधव एकत्र जमा होऊन मुंबईकडे निघणार आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व समाज बंधु-भगिनी, युवक व युवती यांनी मोठ्या संख्येने मराठा आरक्षण दिंडी (पदयात्रा) मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.सदर मोर्चा नाट्य मंदिरापासून ते अंधारे चौक, नगरपालिका, नेहरू पुतळा, महात्मा गांधी पुतळा, महाराष्ट्र व्यायाम शाळा, सोनार खुंट, डॉ.आंबेडकर पुतळा, नवापूर चौफुली इथपर्यंत मोर्चा काढण्यात येऊन या ठिकाणापासून मुंबईकडे पदयात्रा करणार आहेत. सदर पदयात्रा शांततेच्या मार्गाने काढण्यात येणार आहे,
या पदयात्रेमध्ये सुमारे 2 हजार 500 समाज बांधव व महिला भगिनी जाणार असून या मोर्चात एक रुग्णवाहिका व दोन तज्ञ डॉक्टर्स तपासणीसाठी राहतील अशी माहिती नितीन जगताप यांनी यावेळी दिली आहे. यावेळी उमर्दे येथील उपोषणकर्ते गुलाब मराठे, नवनीत शिंदे, प्रकाश हराळ, अर्जून मराठे, विक्की मराठे आधी उपस्थित होते.








