नंदुरबार l प्रतिनिधी
मानवाच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आहार विहारात बदल करणे गरजेचे आहे. यातूनच आजारांपासून दूर राहणे शक्य होईल. भारतात दिवसागणिक आजारांचे प्रमाण वाढले आहे. माधवबागच्या माध्यमातून योग्य उपचार पद्धती अवलंबविल्यास निश्चित फायदा होईल असे डॉ. कीर्ती सूर्यवंशी यांनी सांगितले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक प्रितेश भावसार उपस्थित होते.
दि. 6 ते 10 डिसेंबर दरम्यान दररोज सकाळी 6 ते 7 या वेळेत नियमित योगासन शिबिर झाले. यासाठी नंदुरबार जिल्हा पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष एन. डी. माळी,भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी नवजीत शिंदे, महिला प्रभारी किरण राजपूत, तालुका प्रभारी ळपंअजयसिंह गिरासे, एस.एन. पाटील, धीरज पावरा यांनी मार्गदर्शन केले.
पतंजली योग समितीचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महादू हिरणवाळे, भास्कर रामोळे यांनी संयोजन केले. नंदुरबार आगारप्रमुख संदीप निकम यांनी आभार मानले. संजय मोरे यांनी सूत्रसंचालन केले.पाच दिवसीय योगासन शिबिर यशस्वीतेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातील सहाय्यक वाहतूक अधीक्षक सागर पाडवी, वाहतूक निरीक्षक अजिंक्य नाटकर, ऋषी पावरा देवेंद्र सूर्यवंशी, दिलीप गायकवाड , महिला कर्मचारी ज्योती साळी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.