म्हसावद। प्रतिनिधी
शासकीय आश्रमशाळा तोरणमाळ व कुंभारखान येथील मयत विद्यार्थ्यांचे कुटुंबातील व्यक्तीस सेवेत समावून घेण्याबाबतचे निवेदन एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने तहसीलदार तळोदा यांना यांना देण्यात आले.
उपरोक्त निवेदनात म्हटले आहे की, एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने आदिवासी समाज व मुलं मुली हे देखील शिक्षणाच्या प्रवाहात यावेत याकरिता शासन स्तरावरुन कोट्यवधी निधी खर्च करुन राज्यात आश्रम शाळांची निर्मिती केली .नंदुरबार जिल्ह्यातील आश्रम शाळेत आजही पाहिजे तश्या सोयीसुविधा या जिल्ह्यातील आश्रम शाळेत पुरविण्यात आल्या नाही.त्यामुळे आश्रम शाळेत विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत आहे.नंदुरबार जिल्ह्यातील आश्रम शाळेत वैद्यकीय तपासणी व शालेय प्रशासन यांच्या निष्काळजीपणा मुळे अनेक मुलांचा जीव गेला आहे .या शैक्षणिक वर्षात शहादा तालुक्यातील साबलापाणी, येथे राहणार डेबा दिला पाडवी वय वर्ष 6 हा विद्यार्थी तोरणमाळ येथील शिकत होता.
तसेच सागर उत्तम वसावे हा विद्यार्थी कुंभारखान येथील शिकत होता. विद्यार्थ्यांच्या मृत्यू शालेय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला. सदर विद्यार्थी हा त्यांचा पालकांच्या भविष्यातील आधारस्तंभ असल्याने व त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याने व त्यांच्या कुटुंबात कधीही भरून न निघणारे नुकसान व दुःख झालेला आहे.त्यामुळे मयत विद्यार्थीच्या कुटुंबियांना ५ लक्ष आपल्या स्तरावर तात्काळ मदत करून शासन नियम नुसार त्यास अनुदान तत्काळ प्राप्त करून द्यावा व कुटुंबातील एका व्यक्तीस रोजंदारी वर्ग ३ किवा वर्ग ४ मधे सेवेत घ्यावे.
संघटनेच्या वतीने मयत विद्यार्थी पाठपुरावा केला असताना योग्य ती कार्यवाही एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प तळोदा प्रशासनाकडून दखल घेतली नाही.संघटनेच्या वतीने खालील मागण्या की दोन्हीही मयत विद्यार्थ्यांच्या व कुटुंबातील वर्ग ३ किवा वर्ग ४ नियमित अथवा रोजंदारी तत्वावर सेवेत ‘सामावून – घावे, सेन्ट्रल खिचन तर्फे देण्यात येणारे अन्नाचे राष्ट्रीय अन्न भेसळ तपासणी संस्था, मुंबई यांच्या अहवाल व FSSI मार्फत निर्देशित करण्यात आलेले अन्न तपासणी अहवाल द्यावे. व दरपत्रक द्यावे, वर्ग ३ व वर्ग ४ मध्ये रोजदारी पेसा भरती करण्यात यावे. व स्थानिक उमेदवाराना प्राधान्य देण्यात यावे, खावटी अनुदान योजना पुन्हा राबवण्यात यावे.
ह्या मागणी दि. १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत मान्य करण्यात आले नाही तर एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने दि. 3 ऑक्टोंबर रोजी पासून तहसीलदार कार्यालय तळोदा समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल. होणाऱ्या जीवित तथा वित्तीय हानीस प्रशासन जबाबदार राहील. याची नोंद घ्यावी. त्यावेळी संघटनेचे प्रवक्ता अँड गणपत पाडवी, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष उमेश वसावे, तळोदा तालुका अध्यक्ष सुरेश वळवी, तळोदा तालुका उपाध्यक्ष, शैलेश वसावे, मुनेश पाडवी, सुनील पाडवी आदी उपस्थित होते