Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माता व बालमृत्यू रोखण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी उपचारात तत्परता दाखवावी – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

team by team
August 13, 2023
in राजकीय
0
माता व बालमृत्यू रोखण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी उपचारात तत्परता दाखवावी – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदूरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यातील मातामृत्यू आणि त्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक जोखीमेखालील गरोदर माता, आजारी बाळाला वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची तत्परता अंगणवाडी सेविकांनी दाखवावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

 

 

 

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत यहामोगी सभागृहात अंगणवाडी सेविकांसाठी आयोजित ई-आकार डिजिटल कुशल कार्यशाळेत मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यशाळेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, महिला व बालविकास अधिकारी राठोड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व बालविकास अधिकारी आणि अंगणवाडी पर्यवेक्षक उपस्थित होते.

 

 

यावेळी पर्यवेक्षेकांच्या समस्या ऐकून घेत त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, एकीकडे अंगणवाडींना सोई-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात असतांना त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक कुपोषित बालक आणि गरोदर मातेची विशेष काळजी घेण्याची गरज व्यक्त केली. जर कुपोषित बालक आणि गरोदर माता यांची नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयातून आवश्यकतेनुसार  तपासणी करुन घेतल्यास निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण तत्काळ होवून बालमृत्यूू सारख्या समस्या वेळीच नियंत्रणात आणता येतील. जिल्हा प्रशासन आता बालमृत्युबाबत कडक धोरण अमलात आणत असून ज्या  अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रात पहिल्यांदा बालकाचा मृत्यू झाल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची एक पगार वाढ आणि दुसऱ्यांदा मृत्यू झाल्यास कामावरुन काढण्यात येईल, असेही  त्यांनी यावेळी सांगितले.

 

रॉकेट लर्निंग, महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या संयुक्त विघमानाने “ई आकार कुशल अंगणवाडी कार्यक्रम”  सुरू करण्यात आला ,या कार्यक्रमा अंतर्गत प्रत्येक बिटनिहाय व्हाट्स अॅप ग्रुप्स बनवण्यात आले आहेत. या ग्रुप्स मध्ये दररोज  एक दिवस आधीच  पूर्वनियोजनासाठी बालकांच्या अभ्यासाचे  व्हिडीओ  स्वयंचलितरित्या येतील आणि अंगणवाडी  सेविकांना डिजिटल स्वरूपात प्रमाणपत्र प्रत्येक आठवड्याला मिळतील. बालकांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणे तसेच शिक्षणातील असमानता दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत सेविकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

एस.ए.मिशन हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी लुटला ट्रेकिंगचा आनंद

Next Post

लोकनेते स्व.बटेसिंहभैय्या रघुवंशी यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादनासह रोगनिदान शिबिर,व्यापारी संकुल उद्घाटन : माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

Next Post
मणिपूर महिला अत्याचार घटनेच्या माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून निषेध

लोकनेते स्व.बटेसिंहभैय्या रघुवंशी यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादनासह रोगनिदान शिबिर,व्यापारी संकुल उद्घाटन : माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add