Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जैन समाजाच्या सम्मेद शिखरजी पर्यटन क्षेत्र निर्णयावर तीव्र आक्षेप,काढण्यात आला मोर्चा

team by team
December 22, 2022
in राजकीय
0
जैन समाजाच्या सम्मेद शिखरजी पर्यटन क्षेत्र निर्णयावर तीव्र आक्षेप,काढण्यात आला मोर्चा
नंदुरबार l  प्रतिनिधी
सकल जैन समाजाच्या झारखंड राज्यातील पवित्र प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी परिसराला झारखंड शासनाद्वारे पर्यटन क्षेत्र घोषित  करण्याचे  प्रयत्न सुरू असल्याने या  निर्णयावर नंदुरबारसह संपूर्ण राज्य आणि देशातून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे.दरम्यान झारखंड राज्य शासन निर्णयाच्या निषेधार्थ मंगळवारी नंदुरबार जैन समाजातर्फे मूक मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह झारखंड राज्याचे मुख्यमंत्री तसेच खा. डॉ. हिना गावित,  अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष,    व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि जिल्हाधिकारी मणिषा खत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, झारखंड शासनाने सकल जैन समाजाच्या पवित्र प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी  परिसराला पर्यटन क्षेत्र घोषित केल्यामुळे सकल जैन समाजाच्या धार्मिक स्वतंत्रता आणि मूलभूत अधिकाराला नष्ट करण्याचे  प्रयत्न सुरू आहेत झारखंड शासनाचा निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी संपूर्ण देशातून होत आहे.
पर्यटन क्षेत्र घोषित झाल्यामुळे जैन समाजाचे स्थळाची पवित्रता धोक्यात येण्याची शक्यता आहे.या निर्णयामुळे धार्मिक क्षेत्र पर्यटन क्षेत्र निर्माण होईल.संपूर्ण जैन समाज सम्मेद शिखरजी येथील भूमीवर गेल्यानंतर पवित्रभूमी म्हणून स्वीकार करतात.याच पवित्र भूमीवर 20-20 तीर्थंकरांचे निर्माण  झाले  आहे. याच भूमीचे श्रद्धापूर्वक दर्शन केले जाते.झारखंड शासनाच्या निर्णयामुळे संपूर्ण भारतातील जैन समाजातून निषेध व्यक्त करून संतप्त वातावरण तयार झाले आहे.अहिंसक जैन समाज अल्पसंख्यांक असून अशा निर्णयामुळे जैन समाजाची संस्कृती नष्ट करण्याचे षडयंत्र झारखंड सरकार करीत आहे.पर्यटन क्षेत्र घोषित झाल्यामुळे अनेक  मद्याची  आणि मांस विक्रीची दुकाने, बार आणि रेस्टॉरंट उघडली जातील.जैन समाज शांतीप्रिय, अहिंसक आणि देशात सर्वाधिक कर भरणारा समाज आहे.
झारखंड शासनाच्या तूघलकी निर्णयामुळे हिंसेचे तांडव नृत्य होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.यामुळे याप्रकरणी केंद्र शासनाने लक्ष घालून झारखंड शासनाचा निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी सकल जैन समाज, दिगंबर जैन समाज, श्रीश्रोतांबर मूर्ती पूजक जैन संघ, श्री श्वेतांबर तेरापंथी जैन संघ यांनी केली आहे.निवेदनावर सुरेश जैन, विरल कुवाडिया,पदम  पाटोदी, मदनलाल जैन, प्रकाश कोचर, जेठमल अंबानी यांच्यासह प्रमुख समाज बांधवांच्या स्वाक्षरया आहेत.
झारखंड शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ सकल जैन समाजातर्फे शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला.
या मूक मोर्चात युवकांसह महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आले.
 जैन समाज बांधवांच्या मूक मोर्चाला संबोधित करताना माजी आमदार चंद्रकांत रघुशी यांनी सांगितले की, झारखंड शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे जैन समाज बांधवाच्या भावना पोचविणार असल्याचे  रघुवंशी यांनी सांगितले.परमपूज्य उपाध्याय मनीतप्रभ सागरजी महाराज यांनी झारखंड शासनाचा निषेध करीत जैन समाज बांधवांना संबोधित केले.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा जैन समाजातर्फे तहसिलदार यांना निवेदन 

Next Post

एस.ए.मिशन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा

Next Post
एस.ए.मिशन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा

एस.ए.मिशन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

January 25, 2026
श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

January 25, 2026
रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

January 25, 2026
राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

January 25, 2026
चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

January 25, 2026
नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

January 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add