Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पिकविमा परताव्यात मोठी तफावत समितीची तात्काळ बैठक घेवून शेतकर्‍यांना न्याय द्यावा : बिपीन पाटील

Mahesh Patil by Mahesh Patil
July 4, 2022
in राजकीय
0
पिकविमा परताव्यात मोठी तफावत समितीची तात्काळ बैठक घेवून शेतकर्‍यांना न्याय द्यावा : बिपीन पाटील

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यात पिकविमा कंपनीकडून देण्यात येणार्‍या परताव्यात मोठी तफावत असून पिकविमा समितीची तात्काळ बैठक घेवून आर्थिंक संकटात सापडलेल्या शेकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी आम आदमी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बिपीन चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसे खुलेपत्र जिल्हाधिकारी तथा पिकविमा समितीच्या अध्यक्षा यांना देवून आवाहन केले आहे.

खुलेपत्रात पुढे म्हटले आहे की, नंदुरबार तालुक्यातील जवळ-जवळ सहा हजार शेतकर्‍यांनी सन २०२१-२२ ला आपल्या खरीप पिकांचे पिकविमे काढले होते. शासन दरबारी खूप प्रयत्न केल्यानंतर शेतकर्‍यांना पिकविम्याचे दावे मंजुर करत असतानाही कंपनीने मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांची मोठी फसवणूक केली असून ऑनलाईन व ऑफलाईनच्या भानगडीत बहुतांश शेतकरी वंचित राहिले असून ज्या शेतकर्‍यांना पिकविम्याचे दावे मंजुर करण्यात आले आहेत,

त्या शेतकर्‍यांनाही पिकविमाच्या परताव्यात मोठी तफावत दिसून येत आहे. एकाच मंडळात एका शेतकर्‍याला पंधरा ते सतरा हजार रुपये मिळतात. तर त्याच मंडळातील काही शेतकर्‍यांना हेक्टरी हजार, पंधराशे ते दोन हजार असे दावे मंजुर करण्यात येत असून पिकविमाच्या परतावा संबंधी कुठलीही सूसुत्रता रिलायन्स पिकविमा कंपनीने पाळली नसून त्यामुळे शेतकर्‍यांची मोठी आर्थिक कुचंबना झाली असून आपण नंदुरबार जिल्हाधिकारी व पिकविमा समितीचे अध्यक्ष आहात.

त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील पिकविमा संबंधीच्या शेतकर्‍यांच्या तक्रारींची दखल आपण घेणे अपेक्षित होते. परंतू तसे होतांना दिसून येत नाही. नंदुरबार जिल्ह्यात आमच्या माहितीप्रमाणे गेल्या दोन ते तीन वर्षात एकदाही पिकविमा समितीची बैठक शेतकरी प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेली आढळून येत नाही.

पिकविमा समितीची बैठक होत नसल्या कारणाने शेतकर्‍यांच्या दावाच्या प्रती प्रशासनाची शासनाची तसेच पिकविमा कंपनीचे उदासिन धोरण दिसत असून नंदुरबार तालुक्यातील शेतकर्‍यांनी मागील वर्षी दुष्काळ असतानाही कुठून उसनवार, कुठून व्याजाने पैसे घेऊन आपल्या पिकाचे पिकविमे काढले होते.

परंतू कंपनीच्या नफेखोरीमुळे शेतकर्‍यांवर पुन्हा अन्याय झालेला दिसून येत असून जर प्रशासन शेतकर्‍यांना न्याय देण्याची भुमिका घेत नसेल तर शेतकर्‍यांनी न्याय मागावा कोणाकडे? हे मोठे कोडे असून आमची आपणास कळकळीची विनंती आहे की, शेतकर्‍यांचा अंत पाहू नका.

व तात्काळ पिकविमा समितीची बैठक घेवून तक्रारदार शेतकर्‍यांची तक्रार तात्काळ सोडवून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना न्याय देण्याची भुमिका आपण घ्याल, हीच अपेक्षा करतो, असेही बिपीन पाटील यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पिक विम्यासाठी नंदुरबार तालुक्यातील २० गावातील २०० शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, भरपाई न दिल्यास बेमुदत उपोषण

Next Post

के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची परदेशात उच्च शिक्षणासाठी निवड

Next Post
के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची परदेशात उच्च शिक्षणासाठी निवड

के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची परदेशात उच्च शिक्षणासाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

October 17, 2025
पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

October 17, 2025
भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

October 17, 2025
वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

October 17, 2025
गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

October 17, 2025
एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

October 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group