नंदूरबार l प्रतिनिधी
मंत्रीमंडळात आज झालेल्या बैठकीत कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले आहेत . त्यामुळे
राज्यात यंदा गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात , आनंदात तसेच शोभायात्रा काढून साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे . ठाकरे सरकारने गुढीपाडवा साजरा करण्यावर कुठलेही निर्बंध नसल्याचं जाहीर केलं आहे मुस्लीम बांधवांना रमजान उत्साहात साजरा करता येणार आहे .
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सण – उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते . पण आता कोरोना आटोक्यात आला असून राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे . त्यामुळे हे निर्बंध मागे हटवण्याची मागणी करण्यात येत होती . अखेर आज राज्य मंत्रिमंडळाने आगामी काळात येणारे सण – उत्सव साजरे करण्यावर कुठलेही निर्बंध नसल्याचं जाहीर केलं आहे . राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली . या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे . या संदर्भात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे . आंबेडकर जयंतीला मिरवणुका काढता येणार आहेत . तसेच रमजानही उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे .
दरम्यान आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले.
गेले कित्येक महिन्यांपासून कोरोनाचे गेले काही महिने थोडेफार निर्बंध शिथील करण्यात आले . पण चेहऱ्यावरील मास्क काही हटला नाही . या मास्कपासून कधी मुक्ती मिळणार असंच सर्वांना वाटत होतं . अखेर तो दिवस आलाच . गुढीपाडव्याआधी मास्कमुक्ती झाली . राज्यात आता मास्क वापरणं बंधनकारक नाही.मास्क वापरणे इच्छिक असणार आहे.आज मंत्रिमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले . राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आल्याचं जाहीर केलं आहे . राज्य मंत्रिमंडळाची आता बैठक सुरू आहे या बैठकीनंतर राज्य सरकारकडून अधिकृत पत्रक काढून या संदर्भात माहिती देण्यात येईल .