Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पावसाळी आपत्ती काळात सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे : धनंजय गोगटे

Mahesh Patil by Mahesh Patil
August 27, 2024
in राजकीय
0
पावसाळी आपत्ती काळात सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे : धनंजय गोगटे

नंदुरबार l प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून सतंतधार पावसामुळे जिल्ह्यात कुठेही आपत्ती येवू शकते, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे व सर्वांनी मुख्यालयी थांबावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष धनंजय गोगटे यांनी दिल्या आहेत.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस खासदार ॲड. गोवाल पाडवी, आमदार ॲङ के. सी. पाडवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हा परिषद सदस्य अजित नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हरिष भामरे, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, महावितरणचे अधिक्षक अभियंता अनिल बोरसे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सी.के. ठाकरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती वंदना वळवी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गोगटे म्हणाले की, येणारे तीन ते चार दिवस हवामान खात्याने जिल्ह्यास रेड अलर्ट दिला असल्यामुळे सर्वांनी सतर्क रहावे, जिल्ह्यातील सर्व पाझर तलाव यांची पाहणी करुन आवश्यक ती दुरस्ती करावी. नगरपालिका क्षेत्रात नाले साफ-सफाई करावी. तसेच जिर्ण झाडे, इमारत पडण्याच्या स्थितीत असल्यास त्यावर त्वरीत आवश्यक ती कार्यवाही करावी. नंदुरबार व तळोदा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रम शाळेस संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरीत भेट द्यावी ज्या आश्रम शाळेत पाणी शिरत असेल अशा शाळांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने कार्यवाही करावी. सर्व विभागांनी त्यांच्या कार्य क्षेत्रातील कामांचा सर्वे करुन जी कामे दुरुस्तीची असतील ती त्वरीत करुन घ्यावीत. आपत्तीपूर्वी व आपत्तीच्या काळात व आपत्ती काळानंतर संबंधित प्रत्येक विभागाने नियोजनाप्रमाणे तत्काळ प्रतिसाद द्यावा. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारपणावर वेळीच औषधोपचार करण्यासाठी आवश्यक त्या औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन ठेवावा. सर्व मंडळ क्षेत्रातील धरणांवरील पर्जन्यमापक यंत्रणा तपासून घ्याव्यात.

 

यावेळी झालेल्या चर्चेत खासदार ॲड. गोवाल पाडवी, आमदार ॲड. के.सी. पाडवी, यांनीही सहभाग घेवून जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या आपत्तीबाबत माहिती घेतली.

 

उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हरिष भामरे यांनी यावेळी सांगितले की पाऊस सुरु असतांना जीवतहानी, पशुहानी झाल्यास, रस्त्यांचा संपर्क तुटल्यास, घरात व शेतात पाणी शिरणे, आरोग्य विषयक आपत्ती, शाळांची पत्रे उडणे, जिर्ण इमारती कोसळणे, संरक्षण भिंती तुटणे, वीज तारा पडणे, झाडे पडणे यासारख्या आपत्तीजन्य घटना घडल्यास संबंधित विभागांनी त्याबाबत त्वरीत कार्यवाही करावी असे सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रूपांतर करावे -राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

Next Post

खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास टाळा ठोको आंदोलन, शिवसेना उबाठा पक्षातर्फे इशारा

Next Post
खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास टाळा ठोको आंदोलन, शिवसेना उबाठा पक्षातर्फे इशारा

खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास टाळा ठोको आंदोलन, शिवसेना उबाठा पक्षातर्फे इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

October 20, 2025
आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी पाठपुरावा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार सुमारे 54 लाख रुपयांचा निधी

October 20, 2025
बनारस येथे शिकणाऱ्या धडगाव तालुक्यातील युवकाविरुद्ध प्रक्षोभक व्हिडिओ तयार केल्याप्रमाणे गुन्हा दाखल

बनारस येथे शिकणाऱ्या धडगाव तालुक्यातील युवकाविरुद्ध प्रक्षोभक व्हिडिओ तयार केल्याप्रमाणे गुन्हा दाखल

October 20, 2025
अस्तंबा यात्रेतील मृतांना राज्य सरकारने दहा लाखाची मदत जाहीर करावी, खासदार गोवाल पाडवी व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी

अस्तंबा यात्रेतील मृतांना राज्य सरकारने दहा लाखाची मदत जाहीर करावी, खासदार गोवाल पाडवी व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी

October 20, 2025
‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

October 17, 2025
पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

October 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group