Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात शुद्ध व शाश्वत पाणीपुरवठासाठी जलरथाचा शुभारंभ

Mahesh Patil by Mahesh Patil
February 24, 2024
in राजकीय
0
जिल्ह्यात शुद्ध व शाश्वत पाणीपुरवठासाठी जलरथाचा शुभारंभ

 

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा -2, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार या योजनाविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जलरथाना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.

 

 

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागणात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक एम.डी.धस,भारतीय जैन संघटनेचे डॉ.कांतीलाल टाटीया आदी उपस्थित होते. ग्रामीण भागात लोकसहभागातून शाश्वत पाणीपुरवठा, गावातील पाण्याचे स्त्रोत शास्वत स्वरूपात निर्माण करून बळकट करणे या उद्देशाने जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा -2, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार या योजना विषयी ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जल रथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील ६ तालुक्यासाठी तयार करण्यात आलेल्या ६ जलरथाना आज दि २३.०२.२०२४ रोजी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

 

 

 

 

ग्रामस्थांचा लोकसहभाग वाढवा यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून राज्यातील 34 जिल्ह्यातील 351 तालुक्यातील गावांमध्ये जल रथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ६ तालुक्यात जल रथाद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे . गावात जल रथाच्या माध्यमातून ऑडिओ जिंगल्स वाजविण्यात येणार आहे .तसेच गावात ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात येउन ग्रामस्थांना माहितीपत्रक दिले जाणार आहेत. तसेच भारतीय जैन संघटनेतर्फे नियुक्त केलेल्या समन्वयकामार्फत योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे. तसेच गावातील जलस्त्रोत, तलावातील गाळ काढण्याची मागणी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थांनी केली तर शासनाच्या पोर्टलवर मागणी तात्काळ ऑनलाईन करण्यासाठी भारतीय जैन संघटना सहकार्य करणार आहे .

 

 

जल जीवन मिशन च्या माध्यमातून गावात पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे या अनुषंगाने उत्तम दर्जाची कामे ग्रामस्थांनी करून घ्यावेत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाची कामांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करून गावे स्वच्छ व सुंदर करावीत तसेच जलयुक्त शिवार गाळमुक्त धरण या योजनेतून गावे पाणीदार करावीत असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी यावेळी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

26 ते 28 फेब्रूवारी दरम्यान “जाणता राजा” महानाट्याचे आयोजन; जी.टी.पी. महाविद्यालयाच्या मैदानावर प्रवेश विनामुल्य: मनीषा खत्री

Next Post

स्वातंत्र्यानंतर प्रथमच तोरणमाळच्या दुर्गम भागाला आमच्या प्रयत्नांमुळेच मिळाले रस्ते, पाणी, वीजपुरवठा: खा. डॉ.हिना गावित

Next Post
स्वातंत्र्यानंतर प्रथमच तोरणमाळच्या दुर्गम भागाला आमच्या प्रयत्नांमुळेच  मिळाले रस्ते, पाणी, वीजपुरवठा: खा. डॉ.हिना गावित

स्वातंत्र्यानंतर प्रथमच तोरणमाळच्या दुर्गम भागाला आमच्या प्रयत्नांमुळेच मिळाले रस्ते, पाणी, वीजपुरवठा: खा. डॉ.हिना गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

October 21, 2025
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

October 21, 2025
चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

October 20, 2025
आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी पाठपुरावा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार सुमारे 54 लाख रुपयांचा निधी

October 20, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group