नंदुरबार l प्रतिनिधी
हरणखुरी गावातील एका पती पत्नीच्या जोडप्याने वनराई बंधारा साकारला असून गावातून त्यांचे कौतुक केले जात आहे. गृप ग्रामपंचायत भुजगांवाचे ग्रामपंचायत सदस्या ठुमलीबाई रवींद्र पावरा यांच्या संकल्पनेतून ३५ ते ४० सिमेंट गोण्या वापरून पती रवींद्र इमानवेल पावरा यांच्या सोबतीने हा वनराई बंधारा बनविला.
या वर्षी पाऊस अत्यंत कमी प्रमाणात झाला त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीलाच नाले आटण्यास सुरवात झाली आहे. पुढील काळात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारली जाणार नाही. त्यामुळे पाळीव गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता पासूनच सुरवात झालेली आहे. प्रशासकीय पातळीवरून श्रमदानातून वनराई बंधारे निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. येणाऱ्या काळात पाडयातील लोकांच्या मदतीने आणखी एका बंधारा निर्मिती केली जाणार असून त्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती रवींद्र पावरा यांनी माहिती दिली.
वनराई बंधारामुळे पाडयातील नागरीकांना काही काळ पाण्याची सोय होणार असून जलसंधारण होण्यास काही अंशी मदत होईल अशी प्रतिक्रिया श्रीमती ठुमलीबाई पावरा यांनी दिली.