नंदुरबार l प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्ष समारोपा निमित्त हर घर तिरंगाअभियाना संदर्भात संपूर्ण देशात राष्ट्रीय जनजागृती सुरु आहे. बालवीर चौक परिसरातील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे शालेय विद्यार्थ्यांनी रविवार दि. 13 ऑगस्ट रोजी परिसरात जनजागृती रॅली काढून हर घर तिरंगा लावण्याचे आवाहन केले.
स्वातंत्र्य दिनाचा संदेश देऊन चिमुकल्यांनी हातात तिरंगा घेत भारत माता की जय…वंदे मातरम्…नंदुरबार के शहीद अमर रहे…अशा घोषणा दिल्या. देशभक्तीपर गीतांनी परिसर दुमदुमून गेला होता.याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य संग्रामातील बाल शहिदांचे बलिदान आणि इंग्रजांशी दिलेल्या लढ्याबाबत माहिती दिली.विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली.कृष्णा चौधरी,ओम चौधरी, साई चौधरी या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅलीचे आयोजन केले.