नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कामागार विभाग यांचे अंतर्गत
महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्यातर्फे नंदुरबार जिल्हयातील बांधकाम कामगारांसाठी अंत्यावश्यक व सुरक्षा संचाचे वाटप जिल्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री डॉ.
विजयकुमार गावीत व जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. सुप्रिया गावीत यांनी नंदुरबार जिल्हयातील इमारत बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या संचातील वस्तूंचा योग्य पध्दतीने वापर करून आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होवू नये, सुरक्षा संचातील वस्तुचा वापर नियमीत पध्दतीने करण्याचा सुचना दिल्या तसेच घरकुल योजना, अपघात योजना, कामगारांचा पाल्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती तसेच इतर योजनांचा आढावा घेतला व कामगारांना माहिती दिली. पालकमंत्री महोदयांनी नंदुरबार जिल्हा कामगारांना घरकुल व मध्यान्य भोजनाची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन यावेळी दिले.
मंडळाचे कार्यालय प्रमुख संजय कोकणी हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी केंद्र चालक पी.बी.पाटील, भरत गवळे, सागर पाटील, बीपीन पाटील, प्रितम
पाटील यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्हयातील कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.








