नंदुरबार l प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहे. म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात देशभरात लोकसभा मतदारसंघांमध्ये विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत १ ते ३० जून या कालावधीत टप्प्याटप्प्याने विविध कार्यक्रम घेऊन केंद्रातील मोदी सरकारची नऊ वर्षपूर्ती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी दिली आहे.
नंदुरबार येथील भाजपाच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेंद्रकुमार गावित, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी उपस्थित होते.
यावेळी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत आहे. या नऊ वर्षाच्या वर्षपूर्ती निमित्त भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात देशभर लोकसभा मतदारसंघांमध्ये विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे.
या जनसंपर्क अभियानातून विविध कार्यक्रम घेण्यात येत असून समाजातील विविध घटकांची संपर्क व कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. मोदी सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम विशेष जनसंपर्क अभियानामार्फत केले जात आहे. या अभियानांतर्गत दि. १ जून ते ३० जून या कालावधीत टप्प्याटप्प्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून केंद्र सरकारची नऊ वर्षपूर्ती साजरी करण्यात येत असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी दिली.