नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार धुळे जिल्हा रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जात असते मात्र कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता, त्यामुळे खा. हिना गावित यांच्या प्रयत्नाने सोमेश्वर मार्केटची स्थापना करून नंदुरबार, धुळे जिल्ह्याच्या कांदा थेट रेल्वेने जम्मू काश्मीर येथे पाठवण्यात येत आहे.
जम्मू काश्मीर येथे कांद्याची पहिली खेप ८०० टनाची पाठवण्यात आली असून कांद्याला प्रतिक्विंटल ८०० रुपये भाव मिळाला आहे.
शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव देखील बाहेर राज्यात जात असल्याने शेतकऱ्यांना चांगला मोबदला देखील मिळणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यातून पहिल्यांदा रेल्वेने दुसऱ्या राज्यात कांदा निर्यात केला जात आहे. तर येणाऱ्या काळात नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या कांदा हा बांगलादेश येथे पाठवण्याची देखील व्यवस्था करण्यात येत आहे. नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या कांदा दुसऱ्या राज्यात आणि देशात गेल्याने याच्या फायदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांना देखील होणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही, यापुढे देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळणार आहे. कांद्यावर प्रक्रिया करण्यासाठी ही वेगवेगळे उद्योगांना चालना देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असं खा. डॉ. हिना गावित यांनी सांगितला आहे.








