नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील नगरपालिकेमार्फत धुळे चौफुली परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर त्या जागेवर वृक्षारोपण करण्याच्या निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र दिनानिमित्त परिसरात वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपण कार्यक्रमाच्या शुभारंभ जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी पुलकित सिंह, अभियंता विजय पाटील, रायसिंग गावित, दीपक पाटील, रवी काटे, वाल्मीक मिस्त्री यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी कुंपण करण्यात येणार आहे सदर ठिकाणी कोणी अतिक्रमण केले तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.